शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत कुरकुर करू नये, अन्यथा...; चंद्रहार पाटील यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 17:40 IST

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार विजयी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना माफ केले.

विटा : आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील आठपैकी दोन मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने कुरकूर करू नये. त्यांनी गद्दारीचा विचार सोडून द्यावा, अन्यथा, त्यांना महाराष्ट्रभर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा उद्धवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी रविवारी दिला.विटा येथे ते पत्रकारांशी बाेलत हाेते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिराळा, इस्लामपूर आणि तासगाव या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघासह अन्य एक किंवा दोन ठिकाणी राष्ट्रवादी लढेल, असे जाहीर केले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनीही जिल्ह्यात काँग्रेसचे पाच आमदार असतील, असे म्हटले आहे. त्यांची खिल्ली चंद्रहार पाटील यांनी उडविली.ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात १२-१५ आमदार करायचे असतील तर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात सध्या फक्त आठ मतदारसंघ आहेत आणि तेथे दोन-दोन उमेदवार विजयी करता येणार नाहीत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हिशोबात बोलावे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपातील चर्चेतून सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला होता. मी उमेदवारी केली होती. महाविकास आघाडी म्हणून नेत्यांनी धर्मपालन करणे गरजेचे होते. तेथे गद्दारी केली. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार विजयी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना माफ केले.मात्र आता विधानसभेसाठी ज्याने-त्याने उठून आकडे मांडू नयेत. राज्यात २०१९ ला काँग्रेसचा एक खासदार होता. आता १३ खासदार झाले आहेत. राष्ट्रवादीचे ४ खासदार होते. आता आठ झाले आहेत. यामागे उद्धव ठाकरे यांचे श्रमदेखील महत्त्वाचे आहेत. विधानसभा निवडणुकीत या यशाची पुनरावृत्ती करायची असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी भानावर येऊन संयम ठेवून बोलावे.शिवसेना ठाकरे गट खानापूर आणि मिरज मतदारसंघातून लढणार आहे. दोन्ही ठिकाणी पक्षाची उत्तम बांधणी आहे. २०१४ आणि २०१९ला खानापूर शिवसेनेने जिंकले आहे. मिरज हा शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसैनिकांची ताकद आणि प्रभाव आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांवर दावा सांगून कुणी गडबड करू नये, अन्यथा राज्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा चंद्रहार पाटील यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिला.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाchandrahar patilचंद्रहार पाटीलShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस