शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांतच गंगा पुन्हा अवतरली, गोमुखातून पाणी प्रवाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:47 IST

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे रविवारी पहाटे पुन्हा आगमन झाले आहे. अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राजापूर (जि. रत्नागिरी) - हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे रविवारी पहाटे पुन्हा आगमन झाले आहे. अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गंगामाईच्या आगमनाचे वृत्त समजताच अनेकांनी गंगाक्षेत्री धाव घेत गंगामाईच्या आगमनाची खात्री करून घेतली.
साधारणपणे तीन वर्षांनी अवतरणाऱ्या गंगेच्या गेल्या काही वर्षांत आगमन-निर्गमनाच्या वेळेत आमुलाग्र बदल झाला आहे.
यापूर्वी गंगेचे ७ मे २०१७ रोजी आगमन झाले होते. ती १९ जून
रोजी अंतर्धान पावली होती. त्याचवर्षी ६ डिसेंबर २०१७ आगमन व २० मार्च २०१८ रोजी अंतर्धान पावली होती.

भूगर्भातील बदलांचा परिणाम
भूगर्भामध्ये झालेल्या बदलाचा हा परिणाम असल्याची चर्चा आहे. भूगर्भात काही घडामोडी घडल्यानंतर गंगेचे आगमन झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. २६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला होता, त्या वेळी गंगेचे आगमन झाले होते. भारतासह अवघ्या जगताला त्सुनामीचा तडाखा बसला होता. त्यावेळीही गंगा अचानक अवतीर्ण झाली होती.

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरी