शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By मनोज मुळ्ये | Updated: August 9, 2024 18:33 IST

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात जे आंदोलन केले गेले, त्यातील राजकीय व सामाजिक गुन्हे मागे ...

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात जे आंदोलन केले गेले, त्यातील राजकीय व सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. असे नेमके किती गुन्हे आहेत, याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक लवकरच तयार करतील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी मंत्री सामंत यांनी बारसू तसेच नाणार येथील आंदोलकांचे नेते तसेच ग्रामस्थांसमवेत चर्चा केली. नाणारमध्ये होऊ घातलेल्या बॉक्साईट उत्खननाबाबत ही चर्चा होती. याचवेळी प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. जोपर्यंत ग्रामस्थांशी चर्चा होत नाही, तोपर्यंत सरकार कोणताही प्रकल्प लादणार नाही, कसलीही बळजबरी केली जाणार नाही, अशी भूमिका मंत्री सामंत यांनी पुन्हा एकदा मांडली.बारसूमध्ये झालेल्या आंदाेलनानंतर अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यातील जे गुन्हे राजकीय व सामाजिक विषयांसाठीचे आहेत, ते गुन्हे मागे घेण्यात येतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. किती ग्रामस्थांवर, कोणत्या प्रकारचे, किती गुन्हे दाखल आहेत, याची माहिती काढण्याची सूचना आपण जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना केली आहे. त्यांचा अहवाल तयार झाल्यानंतर पुढील प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे ते म्हणाले.या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह रिफायनरी आंदोलकांचे नेते अशोक वालम, अमोल गोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ हजर होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पagitationआंदोलनUday Samantउदय सामंत