शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईनचाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आठवडाभराचा कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. एकूणच विचित्र परिस्थितीत शाळांचे कामकाज दि.१५ जून ...

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आठवडाभराचा कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. एकूणच विचित्र परिस्थितीत शाळांचे कामकाज दि.१५ जून पासून सुरू झाले, तर अध्यापन मात्र यावर्षीही ऑनलाईनच होण्याची शक्यता आहे. गावा-गावातून कोरोनाने प्रवेश केला असल्याने जिल्हा परिषदेने शाळा ताब्यात घेऊन शाळांमध्येच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या कमालीची वाढली असून, मृतांची संख्याही वाढतच आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शाळा व शाळांमधील अध्यापन सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे ऑनलाईन हाच उपाय सध्या तरी याेग्य आहे. भौगोलिकदृष्ट्या वाडी-वस्तीवर विखुरलेल्या लोकसंख्येमुळे शाळा असल्या, तरी मोबाईलची रेंज या शाळांमध्ये पोहोचलेली नाही. त्यामुळे या शाळांना ऑनलाईन अध्यापन पध्दतीचा उपयोग नाही. शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आसपासच्या गावातून ये-ज़ा करावी लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रुग्णसंख्या कमालीची वाढली असल्याने प्रत्यक्ष अध्यापनासाठी पालक किती तयार होतील, याबाबत शंकाच आहे.

जिल्ह्यातील सर्व अनुदानित शाळेतून पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येत असली, तरी वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करावेच लागते. नव्या वह्या, पुस्तकांचा गंध नक्कीच मोहित करतो. त्यामुळे शाळेचा कंटाळा करणारे विद्यार्थीही पहिल्या दिवसाची आवर्जून प्रतीक्षा करतात. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्यादिवशी नवागताचे स्वागत केले जाते. वाजतगाजत मिरवणूक काढली जाते, पारंपरिक पध्दतीने औक्षण केले जाते. शाळेच्या पोषण आहारात त्यादिवशी चक्क गोड पदार्थांचा बेत आखला जातो. त्यामुळे बालमित्रांनाही शाळेच्या पहिल्या दिवसाची आतुरता लागते. परंतु गतवर्षीपासून कोरोना संकटामुळे शाळेपासून दुरावलेले बालमित्र हिरमुसले आहेत. घरात राहून कंटाळलेल्यांनाही शाळेची ओढ लागली आहे.

शहरातील काही शाळांनी मात्र दहावीचे वर्ग ऑनलाईन पध्दतीने सुरू केले असून, अन्य वर्गही याचपध्दतीने सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी पालकांचे व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करून त्यावर काही सूचना सुरू केल्या आहेत. ऑनलाईन अध्यापन पध्दतीमुळे वेळेची मर्यादा असल्याने गणित, विज्ञानसारख्या विषयांच्या आकलनावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी, प्रत्यक्ष शाळा इतक्यात सुरू होणे अशक्य आहे. गतवर्षीप्रमाणे ऑनलाईनच अध्यापनाचा पर्याय योग्य आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्यादिवशीही मुलांचे प्रत्यक्ष स्वागत न होता ऑनलाईनच होण्याची शक्यता आहे.