शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

रिफायनरी प्रकल्पाबाबत गैरसमज, रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई-video

By मनोज मुळ्ये | Published: April 24, 2023 6:58 PM

सोशल मीडियाचा आधार घेत लोकांच्या भावना भडकवणाऱ्या लोकांवरही लक्ष

रत्नागिरी : राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठीचे एक सर्वेक्षण एमआयडीसीकडून केले जाणार आहे. त्याबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे, अफवा पसरवणे यासारखी कृत्ये करणाऱ्या तब्बल ४५ लोकांवर जिल्हाबंदी, तालुका बंदी, गावबंदी अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. सोशल मीडियाचा आधार घेत लोकांच्या भावना भडकवणाऱ्या लोकांवरही लक्ष ठेवले जात असून, या यादीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.बारसू भागातील सद्यस्थिती आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस खात्याकडून सुरू असलेली कार्यवाही याबाबत पोलीस अधीक्षकांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड याही उपस्थित होत्या.राजापूर तालुक्यात बारसू भागात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे एक सर्वेक्षण एमआयडीसीकडून होणार आहे. हे सर्वेक्षण कधी सुरू होईल आणि कधीपर्यंत चालेल, याबाबत आपल्याकडे माहिती नाही. मात्र या सर्वेक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस खाते बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस खात्याने कोणावरही दडपशाही केलेली नाही. पोलिस केवळ कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, याचेच पालन करत आहेत, असे ते म्हणाले.लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे, अफवा पसरवणे, समाजमाध्यमांचा दुरुपयोग करणे यासारख्या कारणांमुळे ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही जणांना जिल्हाबंदीचे, काही जणांना तालुका बंदीचे तर काही जणांना गावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. दोन लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली असून, त्यांना मंगळवार २५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणखी दोघांवर अशाच पद्धतीने कारवाई करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.गेल्या काही दिवसात जिल्हाधिकारी तसेच मी या भागातील लोकांच्या बैठका घेतल्या आहेत. आंदोलन करण्यापेक्षा जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन लोकांनी आपल्या शंकांचे निरसन करुन घ्यावे, असे आवाहन आम्ही दोघांनीही लोकांना वारंवार केले आहे. मात्र काहीजणांना चर्चा करण्यापेक्षा फक्त विरोधच करायचा आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पPoliceपोलिस