शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
2
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
3
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
4
Top Marathi News LIVE Updates: थोड्याच वेळात दहावीचा निकाल, टक्का वाढणार की घसरणार?
5
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
6
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
7
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
8
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
9
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
10
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
11
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
12
टी-२० संघातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार नवा कर्णधार?; BCCI करतंय विचार
13
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
14
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
15
'उरी' फेम रिवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयचं गैरवर्तन, शिवीगाळही केली; म्हणाली- "जेव्हा तो सामान घेऊन आला..."
16
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
17
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
18
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
19
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
20
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
Daily Top 2Weekly Top 5

वाऱ्यामुळे आंबा पडून शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: April 7, 2015 01:30 IST

संकटामागून संकटे : आता सामना धुळीच्या वादळाशी

रत्नागिरी : कोकणचे मुख्य पीक असलेल्या हापूस आंब्यामागील संकटांचे शुक्लकाष्ठ संपता संपेना. मार्चमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. उरलेली कसर धुळीचे वादळ व प्रचंड वेगाने वाहणारे वादळी वारे भरून काढत असल्याचे दिसून येत आहे. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या कोसळणे शिवाय तयार फळे पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६४,८७४ शेतकऱ्यांचे आंबा व काजूपिकाचे एकूण ३१,८१४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पैकी २०,७१८ हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक, तर ११०९६ हेक्टर क्षेत्रावरील काजू पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातील पीक वाया गेल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.
गेले तीन चार दिवस प्रचंड वेगाने वारे वाहात आहेत. वाऱ्यामुळे फळधारणा झालेली झाडे कोसळणे किंवा फांद्या मोडण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणावर आंबा वाऱ्याने पडून वाया जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ अशी झाली आहे. धूळ प्रचंड प्रमाणात उडत असल्यामुळे आंब्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आंब्याचा नैसर्गिक रंग बदलून धुरकट होण्याची शक्यता आहे.
आंबापीक उत्पादनासाठी वर्षभर शेतकऱ्यांना घ्यावी लागणारी प्रचंड मेहनत तसेच करावा लागणारा खर्च लक्षात घेता यावर्षी उत्पादित पिकाचे नुकसानच मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निदर्शनास येत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा आदेश असतानासुध्दा कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे महिनाभराने अहवालप्राप्त झाला. परंतु धुळीचे वादळ यामुळे होणाऱ्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने पाठविणे गरजेचे आहे. अवकाळीतून बचावलेला आंबा शेतकऱ्यांनी विक्रीस पाठविण्याची सुरूवात केली आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)


धुळीमुळे आंब्याचा मूळ रंग बदलण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. आंबा पुसावा लागणार आहे. मात्र, पुसल्यामुळे नैसर्गिक रंगात बदल होईल, पुन्हा दर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. आंबा व्यवसाय शेतकऱ्यांना तारण्याऐवजी नुकसानाचा धक्का सोसावा लागणार आहे.