1 / 11आजच्या वेगवान जगात केवळ हुशार असणे पुरेसे नाही, तर सामाजिक व्यवहार (Social Skills) चपखल असणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्यांच्या तत्वज्ञानाशी मिळत्याजुळत्या या १० नियमांचे पालन केल्यास तुम्ही कोणत्याही गर्दीत आपला प्रभाव पाडू शकता.2 / 11१. वादापेक्षा शांतता श्रेष्ठ : चाणक्य म्हणतात की, मूर्खांशी वाद घालणे म्हणजे आपली ऊर्जा वाया घालवणे होय. प्रत्येक मताला प्रत्युत्तर देण्याची गरज नसते. कधीकधी शांत राहणे हे समोरच्याला दिलेल्या उत्तरापेक्षा कितीतरी पटीने प्रभावी ठरते.3 / 11२. शांत आवाज, मोठी ताकद : ज्यांचा आवाज सर्वात शांत आणि संयमी असतो, त्यांचेच खोलीवर (सभेवर) नियंत्रण असते. शक्ती ओरडण्यात नसते. चाणक्यांच्या मते, जो नेता किंवा व्यक्ती कठीण प्रसंगात आपला संयम ढळू देत नाही, तोच खरा समर्थ असतो.4 / 11३. अतिरिक्त गप्पा टाळा, विश्वास जपा : एकदा का तुम्ही एखाद्याची गुपितं इतरांना सांगितली किंवा गॉसिपिंग केले, तर तुमचा विश्वास कायमचा उडतो. लोक तुमचे वागणे नेहमी लक्षात ठेवतात. विश्वासार्हता ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे.5 / 11४. जास्त विचारा, कमी बोला : एक चांगला श्रोता नेहमीच लोकांची मने जिंकतो. इतरांचे ऐकून घेतल्यामुळे तुम्हाला माहिती मिळते आणि समोरच्या व्यक्तीला आदराची जाणीव होते. माहिती हेच खरं शस्त्र आहे, असं चाणक्य मानत.6 / 11५. जाहीर कौतुक, खासगी सुधारणा : कोणाचेही कौतुक करायचे असेल तर ते सर्वांसमोर करा, पण चूक सुधारायची असेल तर ती एकांतात सांगा. यामुळे तुमचा आदर वाढतो आणि समोरच्या व्यक्तीचा स्वाभिमानही दुखावला जात नाही.7 / 11६. ऊर्जेचे प्रतिबिंब व्हा, गोंधळाचे नाही : समोरची व्यक्ती कितीही गोंधळलेली किंवा रागात असली तरी, तुम्ही त्यांच्या गोंधळात सामील होऊ नका. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेला प्रतिसाद द्या आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा.8 / 11७. मध्येच बोलणे टाळा : दुसऱ्याचे बोलणे मध्येच तोडणे हे कमकुवत आत्मनियंत्रणाचे लक्षण आहे. समोरच्या व्यक्तीला त्यांचे म्हणणे पूर्ण करू द्या. यामुळे तुम्ही संयमी आहात हे सिद्ध होते.9 / 11८. प्रथम निरीक्षण, मग भाष्य : बुद्धिवान लोक नेहमी शेवटी बोलतात. आधी परिस्थितीचे नीट निरीक्षण करा, लोकांचे म्हणणे समजून घ्या आणि मगच आपले मत मांडा. यामुळे तुमच्या शब्दांना वजन प्राप्त होते.10 / 11९. रहस्य कायम ठेवा : स्वतःबद्दलच्या सर्वच गोष्टी उघड करू नका. थोडं गुपित (Mystery) ठेवल्यामुळे लोकांमध्ये तुमच्याबद्दल आदर आणि कुतूहल टिकून राहते. चाणक्यांच्या मते, आपली रणनीती आणि गुपिते कधीही कोणालाही सांगू नयेत.11 / 11१०. सातत्य म्हणजेच विश्वास : परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपले काम प्रामाणिकपणे करत राहा (Show up). तुमच्या कामातील सातत्यच लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करते.