बंगळुरूच्या एका धाडसी जोडप्याने थेट समुद्राच्या लाटांनाच आव्हान देत एक नवा इतिहास रचला आहे. दानिश अब्दी आणि वृषाली प्रसाद या जोडप्याने श्रीलंका ते भारत हे समुद्रातील साधारण ३२ किलोमीटरचे अंतर पोहून पार करत एक प्रेरणादायी कामगिरी बजावली आहे. दानिश आणि वृषाली यांचे हे यश आजच्या तरुणाईसाठी धैर्य, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाचे एक उत्तम उदाहरण बनले आहे.
या मोहिमेची सुरुवात श्रीलंकेतील तलाईमन्नार येथून झाली. समुद्राचा प्रचंड वेग, सतत बदलणारे प्रवाह आणि शारीरिक थकवा यांसारख्या अनेक आव्हानांशी झुंज देत दानिश आणि वृषाली यांनी सलग १० तास ४५ मिनिटे पोहून भारतातील धनुष्कोडी गाठले. विशेष म्हणजे, हा पोहण्याचा मार्ग ऐतिहासिक ॲडम्स ब्रिज जवळून गेल्याने या मोहिमेला एक विशेष सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. खुल्या समुद्रात पोहणे हे कोणत्याही मैदानी खेळापेक्षा अधिक आव्हानात्मक असते. क्षणाक्षणाला बदलणारे हवामान आणि दिशा बदलणारे पाण्याचे प्रवाह यामुळे पोहण्याचा वेग कायम राखणे कठीण होते. मात्र, या जोडप्याने जिद्द सोडली नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण प्रवासादरम्यान एक सहाय्यक पथक, पॅरामेडिक्स आणि तटरक्षक दलाचे पथक सोबत होते.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
यशस्वीरीत्या किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर दानिश आणि वृषाली यांनी इन्स्टाग्रामवर आपला आनंद व्यक्त केला. "हा प्रवास अत्यंत कठीण होता, आता आम्हाला फक्त १२ तास कोणताही अलार्म न लावता शांत झोपायचे आहे", अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मिश्किलपणे मांडल्या. सोशल मीडियावर या जोडप्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, त्यांच्या या पराक्रमाला हजारो लोकांनी दाद दिली आहे.
Web Summary : A Bengaluru couple, Danish and Vrushali, swam 32 km from Sri Lanka to India in 10 hours 45 minutes. They faced strong currents and fatigue, reaching Dhanushkodi with support. This feat inspires youth with courage and perseverance. The couple expressed their joy on Instagram.
Web Summary : बेंगलुरु के एक जोड़े, दानिश और वृषाली ने 10 घंटे 45 मिनट में श्रीलंका से भारत तक 32 किलोमीटर की दूरी तैरकर पूरी की। उन्होंने मजबूत धाराओं और थकान का सामना करते हुए समर्थन के साथ धनुष्कोडी पहुंचे। यह उपलब्धि युवाओं को साहस और दृढ़ता के साथ प्रेरित करती है। जोड़े ने इंस्टाग्राम पर अपनी खुशी व्यक्त की।