शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

नाराज की लोकसभेत दिलेले वचन? राजस्थानच्या मंत्र्याचा राजीनामा, भाजपला पोटनिवडणुकीतही बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 11:46 IST

लोकसभा निवडणुकीत राजस्थान पुर्वेच्या सातपैकी एकही सीट भाजपा हरली तर राजीनामा देण्याची घोषणा मीणा यांनी केली होती. यापैकी चार जागा भाजपा हरली होती.

राजस्थान सरकारमध्ये कृषी मंत्री असलेले किरोडीलाल मीणा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत राजस्थान पुर्वेच्या सातपैकी एकही सीट भाजपा हरली तर राजीनामा देण्याची घोषणा मीणा यांनी केली होती. यापैकी चार जागा भाजपा हरली होती, यामुळे विरोधी पक्ष काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. 

मीणा यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे १० दिवसांपूर्वीच राजीनामा सोपविला होता. याची घोषणा त्यांनी आज केली आहे. ज्या सातपैकी चार जागा भाजपा हरली त्या दौसा, करौली-धौलपूर, टोंक-सवाई माधवपूर आणि भरतपूर या आहेत. लोकसभा निवडणुकीची हार हे फक्त एक निमित्त आहे. खरेतर कृषी मंत्रालयाकडून कृषी विपणन आणि ग्रामीण विकास मंत्रालयातून पंचायत राज हे वगळून मीणा यांना मंत्री बनविण्यात आले होते. यामुळे ते पहिल्या दिवसापासून नाराज होते. 

याचबरोबर दौसामधून त्यांनी त्यांचा भाऊ जगमोहन मीणा यांच्यासाठी तिकीट मागितले होते. परंतू पक्षाने कन्हैयालाल मीणा यांना तिकीट दिले होते. यामुळेही ते नाराज झाले होते. मीणा हे सवाईमाधवपूर येथून आमदार आहेत. तिथेही भाजपाचा पराभव झाला होता. 

किरोडीलाल मीणा यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पारंपारिक मीणा आदिवासी मते भाजपकडे गेली होती. परंतु मीणांकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याने मीणा यांनी ही मते काँग्रेसकडे फिरविली. पूर्व राजस्थानमध्ये डॉ. किरोडीलाल मीणा यांचे वर्चस्व आहे. दौसा आणि देवली-उनियारा या जागांवर विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीतही मीणा यांची नाराजी भाजपाला भोवण्याची चिन्हे आहेत. 

मीणा हे मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही अनुपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर मीणा यांना दिल्लीत बोलविण्यात आले होते. परंतू मुख्यमंत्र्यांसोबत संबंध ताणले गेल्याने पुढची चर्चा थांबली होती. अखेर आज मीणा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला का गेला नाही, या प्रश्नावर मी राजीनामा दिल्याने गेलो नाही असे उत्तर दिले आहे. तसेच नाराजी नाही तर लोकसभेत दिलेल्या वचनामुळे मी राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा