शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 18:12 IST

Tamil Nadu Politics: अभिनेता विजय आणि राज्यपाल यांच्या नेमकी काय चर्चा झाली, राजेंद्र आर्लेकरांची नेमकी भूमिका काय?

Tamil Nadu Politics: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात 'त्रिशंकू' स्थिती निर्माण झाली आहे. सर्वांत मोठा पक्ष असलेल्या टीव्हीके यांनी राज्यपालांची भेट घेतली खरी, परंतु, बहुमत नसल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी टीव्हीके पक्ष प्रमुख अभिनेता विजय पुन्हा एकदा लोकभवन येथे गेला होता. परंतु, त्याला रिकाम्या हाती परतावे लागल्याचे म्हटले जात आहे. यानंतर लोकभवन बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष 

काँग्रेस आमदारांसह ११२ आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा विजयने केला. असे असूनही, त्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चेन्नईतील लोकभवनबाहेर मोठे आंदोलन सुरू केले. तसेच भाजपावर याचे खापर फोडले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा हे योग्य जागा आहे, लोकभवन नव्हे. बहुमत चाचणी हीच एकमेव योग्य पद्धत आहे आणि राज्यपालांनी त्यानुसार कार्यवाही करावी, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. १०८ आमदारांसह टीव्हीके हा सर्वांत मोठा पक्ष आहे आणि घटनेनुसार राज्यपालांनी विजय पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावणे आवश्यक होते.असे घडले नाही, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भूमिका नेमकी काय?

पीटीआयच्या वृत्तानुसार, सरकार स्थापन करण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाला आमंत्रित करणार नाही, असे आश्वासन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना दिले आहे. तसेच सत्तास्थापनेसाठी एक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. विजय यांनी त्यांच्या समर्थक आमदारांच्या सह्यांची यादी घेऊन परत यावे. प्रत्येक आमदाराच्या सह्यांची यादी सादर केल्याशिवाय शपथविधीची प्रक्रिया पुढे जाणार नाही. पाठिंब्याचा दावा कागदोपत्री पूर्णपणे ठोस असला पाहिजे. सत्ता स्थापनेनंतर सरकार स्थिर राहावे, शपथविधीनंतर ते लगेच कोसळू नये, असेही राज्यपालांनी म्हटल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते पलानीस्वामी यांनी अद्याप राज्यपालांची भेट मागितलेली नाही. आंदोलने अधिक तीव्र झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागला. तिरुपूरहून आलेले कार्यकर्ते संतप्त झाले होते आणि लोकशाही प्रक्रियेचे पालन केले जात नसल्याचे त्यांनी म्हटले. शपथविधी सोहळा पार पडेपर्यंत चेन्नईमध्येच थांबण्याचा त्यांनी आता निर्णय घेतला आहे. आपले नेते मुख्यमंत्री झालेले पाहिल्यानंतरच आपण परत येऊ, असे त्यांचे म्हणणे आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu Governor Stalemate: Vijay's Second Attempt Fails, Supporters Protest.

Web Summary : Tamil Nadu faces a hung assembly. Despite claiming support, Vijay's party was denied government formation. Supporters protested, alleging bias. The Governor seeks verified signatures, emphasizing stability before the oath. Tensions escalate as supporters vow to stay until Vijay becomes Chief Minister.
टॅग्स :Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६TamilnaduतामिळनाडूThalapathy Vijayथलपती विजयPoliticsराजकारण