शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील, कृषिमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 1:39 AM

दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ केले आहे. त्याचप्रमाणे दोन लाख रुपयांवरील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे आणि जे शेतकरी नियमित पीक कर्जाचे हप्ते परतफेड करत आहेत.

अलिबाग : दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ केले आहे. त्याचप्रमाणे दोन लाख रुपयांवरील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे आणि जे शेतकरी नियमित पीक कर्जाचे हप्ते परतफेड करत आहेत. त्यांचीही कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे दिली.जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना येणाºया अडचणी, समस्यांचे निवारण करणे, योग्य सल्ला देणे, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकºयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर जिल्हा नियोजन भवनमध्ये त्यांच्या हस्ते प्रगतिशील शेकºयांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या जीवनशैलीतून समाजाला अन्नधान्य व उपजीविका पुरवली जाते. शेती ही त्याची जीवनपद्धती असल्याने त्यांनी त्याकडे कधीही व्यवसाय म्हणून पाहिले नाही. फायदा, नुकसान काहीही झाले तरी तो तेवढ्याच उमेदीने पुढच्या वर्षी पुन्हा कामाला लागतो. याच पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत त्यावर ओढवणाºया समस्यांचे ओझे सुसह्य करणे आणि त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शेतकºयांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे भुसे यांनी सांगितले.सरकारने शेतकºयांचा हितासाठी शेतकरी कर्जमाफी योजना राबविली आहे. या योजनेतून दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे. त्याचा लाभही जिल्ह्यातील शेतकºयांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. दोन लाख रुपयांवरील ज्या शेतकºयांचे पीक कर्ज आहे आणि जे शेतकरी नियमित पीक कर्जाचे हप्ते परतफेड करत आहेत. त्यांचीही कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतकºयांच्या शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्याकरिता सरकारच्या विविध यंत्रणांकडून शेतकºयांसाठी राबवण्यात येणाºया योजनांच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधून त्यांचे सनियंत्रण करण्यासाठी तालुका स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कक्षाला भेट देणाºया सर्व शेतकºयांची नोंदी ठेवण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.राज्यात आज जवळपास ५०० पेक्षा अधिक कार्यालयात या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. शेतकºयांना कमीत कमी खर्चात उत्पादन कसे घेता येईल, त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी वाहन व्यवस्था, मालाला योग्य दर मिळणे, मालाची साठवणूक करून ठेवण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत. त्या देण्यासाठी सरकार स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील, असेही भुसे यांनी सांगितले. या वेळी आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, कृषी अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा प्रशासन तत्पर-बैनाडेजुन-जुलैमध्ये जिल्ह्यात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून आलेली १६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकºयांना वाटप करून झाली आहे. अद्यापही सहा कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासन नेहमीच शेतकºयांच्या मदतीसाठी तत्पर आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील, अशी हमी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिली.प्रगतशील शेतकºयांचा सन्मानयाप्रसंगी प्रगतशील शेतकºयांचा सत्कार कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. उत्तम पाटील, कुसुंबळे ता. अलिबाग, मकरंद अरविंद आठवले नागाव, ता. अलिबाग, सतीश कृष्णा म्हात्रे, कार्ले, ता. अलिबाग, प्रकाश कृष्णा पाटील, सातघर, ता. अलिबाग, महादू बाळू सुतक, आधरणे, ता. पेण, बळीराम बाळू पाटील, गागोदे, ता. पेण आणि अनंत चिंधू डिंगळे, वाकरुळ, ता. पेण या प्रगतशील शेतकºयांचा समावेश होता.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार