शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट; एआयच्या मदतीने उत्पादन वाढवता येईल, हर्षवर्धन पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:52 IST

एआयच्या मदतीने उसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवता येते तर ३० टक्के उत्पादन खर्च वाचविता येतो

पुणे: निवडणुका, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे देशातील साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट झाली आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटले आहे. मागील आर्थिक वर्षांतील देशातील २९० लाख मेट्रिक टनाच्या तुलनेत यंदा २४१ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. या हंगामात ५३३ साखर कारखान्यांपैकी ३८० कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ५३४ कारखान्यांपैकी केवळ २४० कारखाने बंद झाले होते. साखरेचे उत्पादन घटल्याने दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

‘उसाच्या गळितावर आणि साखरेच्या उताऱ्यावर परिणाम झाल्याने साखर कारखाने लवकर बंद होत आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या साखर उत्पादनात अग्रेसर राज्यांतील साखर उद्योगाला फटका बसला आहे. राज्यात ८३८ लाख मेट्रिक टन गाळप झाले असून, मागील हंगामात झालेल्या १०३० लाख मेट्रिक टनापेक्षा ते १८.६५ टक्क्यांनी कमी आहे. ७९.२० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले असून, ते मागील वर्षीच्या १०५ लाख मेट्रिक टनापेक्षा २४ टक्क्यांनी कमी आहे. राज्यातील २०० पैकी १८० कारखाने बंद झाले आहेत. मागील वर्षी ही संख्या केवळ १०३ होती,’ अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

‘उत्तर प्रदेशातील उसाचे गाळप ८७५ लाख मेट्रिक टन झाले असून, ते मागील वर्षी ८७६ लाख मेट्रिक टन होते. मागील वर्षी ९२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, यंदा ८४ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने चालू आर्थिक वर्षासाठी देशांतर्गत घरगुती वापरासाठी साखरेचा विक्री कोटा १३७.५० लाख मेट्रिक टन निर्धारित केला होता. उत्पादन घटल्याने एस ग्रेड साखरेची किंमत ३७८० ते ३८३० रुपये प्रतिक्विंटल आणि एम-ग्रेड साखरेची किंमत ३९६५ ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. इथेनॉल उत्पादनात प्रगती झाली असून, ३०३ कोटी लिटर इथेनॉल पेट्रोलमिश्रणासाठी वापरण्यात आले आहे. आगामी आर्थिक वर्षांत साखर उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात अंदाजे ११० ते १२० आणि देशात ३५० लाख मेट्रिक टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.

‘देशात उसाचे क्षेत्र ६० लाख हेक्टर असून उत्पन्न ८० टन प्रतिहेक्टरवर थांबले आहे. उसाचे दर्जेदार उत्पादन, आर्थिक विकास आणि साखर उद्योगाला स्थैर्य मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर अनिवार्य झाला आहे. एआयच्या मदतीने उसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवता येते तर ३० टक्के उत्पादन खर्च वाचविता येतो, हे मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रात्यक्षिकांसह दाखविले आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात याचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले,’ असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसMONEYपैसाMaharashtraमहाराष्ट्र