शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 12:00 IST

४०० जागा कशासाठी हव्यात ते त्यांनी देशाला एकदा तरी सांगावे असे ते म्हणाले....

पुणे : लोकशाहीच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष देशाच्या राजकीय क्षेत्रात दहशतीचे वातावरण पसरवत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात भाजपविरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये लाट आहे असा दावा काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला. ४०० जागा कशासाठी हव्यात ते त्यांनी देशाला एकदा तरी सांगावे असे ते म्हणाले.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राऊत यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी त्यांचे स्वागत केले. राऊत म्हणाले, सरकारी यंत्रणाचा इतका मोठा गैरवापर याआधीच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता. वेठीला धरल्यासारखे सरकारी यंत्रणांना वागवले जात आहे. हा राजकीय क्षेत्रात दहशत पसरविण्याचाच प्रकार आहे.

देशाचे वातावरण पाहण्यासाठी म्हणून आपण काही राज्यात गेलो होतो असे राऊत यांनी सांगितले. उत्तर प्रदेश या त्यांना त्यांच्या वाटणाऱ्या राज्यासह अनेक राज्यांमध्ये सामान्य जनतेमध्ये भाजपच्या राजकारणाचा राग आहे. महाराष्ट्रात तर त्यांनी राजकारणाचा जो काही प्रकार केला तो जनतेला आवडलेला नाही. मतदार मतपेटीतून त्यांना याचे बरोबर उत्तर देतील असा दावा राऊत यांनी केला.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुरुवातीपासूनच देशाची राज्यघटना, इतकेच काय तिरंगी ध्वजही मान्य नाही. त्यामुळे राज्यघटना बदलण्यासाठी म्हणूनच त्यांना लोकसभेच्या ४०० पेक्षा जास्त जागा हव्यात. तसे नसेल तर त्यांनी देशातील जनतेला ते सांगावे असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतBJPभाजपाpune-pcपुणेcongressकाँग्रेसravindra dhangekarरविंद्र धंगेकर