शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

लाखो गिग वर्कर्स कायद्याविना निराधार; देशात ५ राज्यांचा पुढाकार, महाराष्ट्रात मात्र काहीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:08 IST

राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगणा या ५ राज्यांनी पुढाकार घेत त्यांच्या राज्यातील गिग वर्कर्ससाठी स्वतंत्र कायदे तयार केले.

पुणे : डिलिव्हरी बॉइज ही नवी कामगार संकल्पना आधुनिक काळात निर्माण झाली आहे. काही लाख तरुण यात राज्यभरात काम करत आहेत. त्यांच्यासाठी कायदा करण्यात, योजना जाहीर करण्यात देशातील ५ राज्यांनी पुढाकार घेतला आहे, मात्र प्रगत राज्य म्हणवणारे महाराष्ट्र राज्य यात अजूनही मागे आहे. चर्चा सुरू आहे, मात्र केंद्र सरकारने नव्या श्रमसंहितेत यासंबधी भाष्य केल्याने राज्याने आपली सगळी प्रक्रियाच थांबवली आहे.

राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगणा या ५ राज्यांनी पुढाकार घेत त्यांच्या राज्यातील गिग वर्कर्ससाठी स्वतंत्र कायदे तयार केले. या कामगारांना विमा संरक्षण दिले. त्याचबरोबर त्यांचा उपयोग करून घेणाऱ्या कंपन्यांवरही काही बंधने घातली. गिग वर्कर्सची नोंदणी सक्तीची केली. त्यामुळे त्यांच्याकडे किती गिग वर्कर्स आहेत, याची पक्की माहिती असल्याने त्यांच्यासाठी योजना तयार करणे, त्या राबवणे त्यांना शक्य झाले. महाराष्ट्रात गिग वर्कर्सची अशी साधी नोंदणीही केली गेलेली नाही. कोरोना काळात बांधकाम कामगार, घरेलू कामगार यांचीही नोंदणी केली नसल्याने त्यांच्यासाठी योजना राबवणे अवघड झाले होते. अखेरीस कामगार आयुक्त कार्यालयाकडे बांधकाम कामगार, घरेलू कामगार यांची नोंदणी करण्याचे काम देण्यात आले. गिग वर्कर्स मात्र अजूनही विनानोंदणीच आहेत.

कंपनीतून वस्तू किंवा खाद्यपदार्थ घेऊन ते मागणी नोंदवली गेलेल्या ठिकाणी पोहचवणे हे काम यात केले जाते. याशिवाय चालक म्हणूनही नोंदणी करता येते व मागणी आली की, तिथे जाऊन वाहन चालवण्याचे काम करता येते. मात्र, कामगार म्हणून कायद्याचे, सामाजिक सुरक्षिततेचे, स्वयंसेवी संस्था, संघटना यांचे कोणतेही पाठबळ त्यांना नाही. त्यांच्यासाठी कसलाही कायदा नाही. विमा संरक्षण नाही. इतकेच काय संख्येने इतके मोठे असूनही या गिग वर्कर्सची कोणताही कामगार संघटनाच नाही. त्यामुळे मिळेल तो पगार घेऊन हे काही लाख तरुण राज्यात काम करत आहेत.

केंद्र सरकारने देशातील कामगार कायद्यांचे एकत्रिकरण करत ४ कामगार संहिता तयार केल्या. त्यापैकी एका संहितेत या कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा आहे. त्यावर केंद्र सरकारकडूनच अद्याप काही हालचाल झालेली नाही. त्याचा आधार घेत महाराष्ट्राने या विषयावर सुरू असलेले काम थांबवले आहे. त्यामुळे राज्यातील हे गिग वर्कर्स शब्दश: निराधार झाले आहेत. अपघात झाला किंवा आजारी असले, तर तरीही त्यांना कसलीही मदत मिळत नाही. उलट डिलिव्हरी लवकर केली तर इन्सेटिव्ह (ठरले होते त्यापेक्षा थोडे जास्त पैसे) असे जाहीर करून त्यांच्यात स्पर्धा लावली जाते. त्यातून त्यांच्या जिवाचा धोका आणखी वाढतो.

देशातील अन्य राज्ये यात काम करू शकतात, तर मग महाराष्ट्र का नाही?, असा आमचा प्रश्न आहे. यांची संघटना बांधणे अशक्य आहे, कारण त्यांना नोकरीची शाश्वती नाही. आज एका कंपनीत तर उद्या दुसऱ्या कंपनीत अशी त्यांची स्थिती असते. फक्त कल्याणकारी महामंडळ स्थापन करून भागणार नाही, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करणे गरजेचे आहे.  - सुनिल शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर संघ

English
हिंदी सारांश
Web Title : Lakhs of Gig Workers Without Law; Maharashtra Lags Behind

Web Summary : Lakhs of gig workers lack legal protection in Maharashtra, unlike five other states. These states have enacted laws providing insurance and regulations for companies. Maharashtra's inaction leaves workers vulnerable, awaiting central government action. Labor unions advocate for independent laws.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र