शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कायद्यातील बदल कामगारविरोधी ठरू नयेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:43 IST

सेरांग यांनी यावेळी उपस्थित कामगार प्रतिनिधींबरोबर वैयक्तिक चर्चा करत त्यांचे प्रश्न समजावून घेतले.

पुणे : कामगार क्षेत्रात जगभरात अनेक बदल होत आहेत, भारतातही नवे कामगार कायदे लागू झाले आहेत, मात्र असे बदल होताना ते कामगारविरोधी किंवा कामगारांचे हित धोक्यात आणणारे होऊ नयेत, यासाठी कामगार संघटनांनी जागृत राहायला हवे, असे मत इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (आयटीएफ) या जागतिक संघटनेचे भारतातील अध्यक्ष अब्दुलगनी सेरांग यांनी व्यक्त केले.

फेडरेशनशी संलग्न असलेल्या पुण्यातील राष्ट्रीय मजदूर संघटनेच्या कार्यालयाला सेरांग यांनी रविवारी भेट दिली. यावेळी पुणे शहरातील मेट्रो कर्मचारी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, पीएमपीलमधील कर्मचारी, तसेच महापालिकेतील कचरा वाहतुकीच्या वाहनांवर काम करणाऱ्या चालकांबरोबर त्यांनी चर्चा केली. संघाचे अध्यक्ष नगरसेवक सुनिल शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. संघटक विशाल बागूल यांनी प्रास्तविक केले. सेरांग यांनी यावेळी उपस्थित कामगार प्रतिनिधींबरोबर वैयक्तिक चर्चा करत त्यांचे प्रश्न समजावून घेतले.

कामगार आमूलाग्र बदल होत आहेत. कामगार संघटनांनी लढा देत मिळवलेल्या अनेक हक्कांवर त्यामुळे गदा येत आहे. या सर्व परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. बदल होत राहणारच, पण त्या अनुषंगाने तयार होणारे कायदे कामगारांचे नुकसान करणारे होणार नाहीत हेही पाहणे महत्त्वाचे आहे. कारण, कायदे तयार करणाऱ्यांवर कामगारांपेक्षाही भांडवलदारांचा अधिक प्रभाव असतो, अशी टीकाही सेरांग यांनी केली.

भारताविषयी बोलताना ते म्हणाले, “इथेही अनेक बदल होत आहेत. विशेषत: वेगवेगळ्या कामगार कायद्यांचे एकत्रिकरण करून सरकारने ४ स्वतंत्र कामगार संहिता तयार केल्या आहेत. वास्तविक त्या करताना कामगार संघटनांना विश्वासात घेणे गरजेचे होते, मात्र तसे झालेले नाही. त्यामुळेच आता या कामगार संहिता लागू झाल्यानंतर कामगार क्षेत्रातून त्याविषयी रोष निर्माण होताना दिसत आहे. यासाठी आधीच अशा घडामोडींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते.” वाहतूक क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एकत्र येऊन काही करता येईल का? याचा आराखडा तयार करण्यात येईल, असे सेरांग यांनी सांगितले.

कामगार कायद्यात आमूलाग्र बदल होत आहेत. कामगार संघटनांनी लढा देत मिळवलेल्या अनेक हक्कांवर त्यामुळे गदा येत आहे. या सर्व परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. बदल होत राहणारच, पण त्या अनुषंगाने तयार होणारे कायदे कामगारांचे नुकसान करणारे होणार नाहीत, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. कारण, कायदे तयार करणाऱ्यांवर कामगारांपेक्षाही भांडवलदारांचा अधिक प्रभाव असतो, असे सेरांग म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे