शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या विश्रांतवाडीतील शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण; विद्यार्थी संतापले

By अजित घस्ते | Updated: July 25, 2022 15:41 IST

जेवणाचा दर्जा सुधारून न्याय मिळणार का? विद्यार्थ्यांचा सवाल

पुणे: राहणे व जेवणाची सोय असते म्हणून गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी गावाबाहेर पडण्याचे धाडस करतात. शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना सुविधांऐवजी विविध समस्यांचाच सामना करावा लागत आहे. जेवणाचा दर्जा सुधारून न्याय मिळणार का, असा प्रश्न सामाजिक न्याय विभागाच्या विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी विचारत आहेत.

विश्रांतवाडी येथील युनिट एक, संत ज्ञानेश्वर व कोरेगाव पार्क या मागासवर्गीय मुलांचा शासकीय वसतिगृहातील जेवणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. नाश्ता आणि जेवणही वेळेवर मिळत नाही. स्वयंपाकगृहात स्वच्छतेचा अभाव आहे. दर महिन्याला दिला जाणारा भत्ताही वेळेवर मिळत नाही. याबाबत तक्रार केली असता मीसुद्धा हेच जेवण खातो, असे सांगितले जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

वसतिगृहातील समस्या

- स्वयंपाकगृहात अस्वच्छता
- जेवणाचा दर्जा नाही
- नियमांप्रमाणे जेवणात मेनू नाहीत
- पाण्याची सोय नाही
- वेळेवर नाश्ता मिळत नाही

प्रतिविद्यार्थी मिळतात ४८०० रुपये

सामाजिक न्याय विभागातील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी जेवणासाठी ४८०० रुपये दिले जातात. यात नाश्ता, दूध, चहा, दोन वेळचे जेवण आदींचा समावेश असताे. त्याच जेवणात पापड, लोणचे, सॅलेड, रविवारी चिकन/मटण, शुक्रवारी अंडाकरी असा समावेश आहे.

वेळेत मिळेना नाश्ता

येथील विद्यार्थी इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गातील आहेत. सकाळच्यावेळी महाविद्यालय असल्याने वसतिगृह सकाळी ६ वाजताच सोडावे लागते. येथे सकाळचा नाश्ता ७ वाजता दिला जातो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाश्ता न करताच महाविद्यालयाला जावे लागते. यात त्यांची उपासमार हाेते.

विद्यार्थी म्हणतात...

वसतिगृहाच्या गृहप्रमुखाकडे तक्रारी घेऊन जाताे तेव्हा ते सगळं काही तर ठीक आहे, असे म्हणतात. मग आम्ही कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांना पडला आहे. - नामदेव येरकलवाड, विद्यार्थी.

निकृष्ट जेवण देणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल. - मारोती गायकवाड, महाविद्यालयीन विद्यापीठ प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार  नाश्ता आणि जेवण मिळेल 

येथील वसतिगृहात चारशे विद्यार्थी असतात. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. त्याप्रमाणे जेवण देणे शक्य नाही. जेवणाचा दर्जा चांगला आहे. काही तक्रार असेल तर त्याची नाेंद घेऊन आवश्यक सुधारणा केली जाईल. नाश्ता वेळेत मिळत नसेल तर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सकाळी लवकर दिला जाईल. - संतोष जैन, गृहप्रमुख, शासकीय वसतिगृह, पुणे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीEducationशिक्षणSocialसामाजिकcollegeमहाविद्यालय