शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना शालेय पोषक आहाराऐवजी धान्याचे वाटप करण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 19:33 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे

पुणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे शालेय पोषण आहारता दिल्या जाणा-या तांदळाचे व कडधान्याचे वाटप विद्यार्थ्यांमध्ये करावे, असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. 

राज्यात शासनातर्फे अंगणवादीसह शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यात तांदूळ, डाळी व कडधान्य आदींचा समावेश असतो. तसेच प्रत्येक शाळेकडे एक ते दोन महिन्यांचे धान्य उपलब्ध असते. 'कोरोना' मुळे मार्च महिन्यातच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. सध्या शाळा व अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात नव्हता. तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकारचे मत विचारात घेतले.तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळा, हंगामी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिले जाणारे धान्य वितरीत करण्याचे आदेश दिले .

उप सचिव राजेंद्र पवार यांनीही याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक योजनेचे काम पहाणारे शिक्षण व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी शाळेत शिल्लक असणाऱ्या धान्याचा आढावा घ्यावा. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना समान धान्य वाटप करावे.धान्य वाटप करताना शाळेत गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक विद्यार्थी व पालकांना वेळा ठरवून द्याव्यात. शाळेत धान्य वाटप करण्यापूर्वी त्याची माहिती जिल्हाधिकारी व स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक आहे. धान्य वाटप करण्यासाठी शाळेत आलेल्या पालकांमध्ये एक मीटरचे सामाजिक अंतर असले पाहिजे.पालक किंवा विद्यार्थी आजारी असल्यास त्यांना घरपोच धान्य देण्याची सोय करावी,असे पवार यांनी काढलेल्या परिपत्रकात नमुद केले आहे. 

प्रतिक्रिया :

जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये दोन महिन्यांचा शालेय पोषण आहाराचा धान्य साठा उपलब्ध असू शकतो. सध्या शाळा बंद असल्यामुळे शालेय पोषण आहार अंतर्गत दिले जाणारे तांदूळ, डाळी,कडधान्य यांचे वाटप विद्यार्थ्यांना करणे शक्य होत नाही. शालेय पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या धान्याचे योग्य वेळी वाटप न झाल्यास ते खराब होऊ शकते. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व धान्याचे वाटप शाळेमध्ये गर्दी होऊन देता  वितरीत करावे."

- दत्तात्रेय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थी