शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत केवळ २०.७१ टक्के पाणी

By admin | Updated: April 7, 2015 05:33 IST

उजनीचे पाणी दररोज मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगतचा (बॅक वॉटर) शेतकरी धास्तावला आहे

पळसदेव : उजनीचे पाणी दररोज मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगतचा (बॅक वॉटर) शेतकरी धास्तावला आहे. सध्या उजनी धरणात २०.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने मे महिन्यात काय परिस्थिती ओढावेल, याची चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. उजनी धरणातून मागील आठवड्यात चैत्रवारीसाठी भीमा नदीत पाणी सोडणे सुरू केले आहे. मात्र, सोमवारी दुपारी उजनी धरण व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, पाणी सोडणे बंद केले आहे. सध्या उजनी धरणात २०.७१ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले. उजनीच्या पाण्यावरच निम्म्या तालुक्याचे अर्थकारण आहे. भिगवण ते हिंगणगावपर्यंतचा पट्टा उजनीच्या पाण्यावर अवलंबून असतो. शेतीसाठी लागणारे पाणी, औद्योगिक वसाहती व साखर कारखानेसुद्धा उजनीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. त्यामुळे उजनीला इंदापूर तालुक्याची वरदायिनी समजले जाते. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात ऊस हे मुख्य पीक घेतले जाते. मात्र, गेल्या आठ दिवसांत उजनीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. शेतीला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांना पाईपची संख्या वाढविणे, केबलची (वायर) लांबी वाढविणे आदी गोष्टी कराव्या लागत आहेत. मात्र दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पाणीपातळीमुळे मे महिन्यात धरणात किती साठा शिल्लक राहणार अशी चिंता सध्या शेतकरी व्यक्त करीत आहेत. वास्तविक उजनीच्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. ज्यांनी उजनी धरणासाठी जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांवरच एक प्रकारे अन्याय केला जात असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंत्री, नेतेमंडळींनी ओरड केली की पाणी सोडले जाते. मात्र इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनीधी मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. (वार्ताहर)