शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षात महाराष्ट्र-बंगाल मैत्रीचा नवा अध्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 18:39 IST

दोन्ही राज्यातील कवी, नेते,लेखक, आणि कलाकार यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरहद संस्थेचा पुढाकार : मराठी, बंगाली भाषेतील ५० पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : स्वातंत्र्यलढ्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. लाल (लाला लाजपत राय), बाल (लोकमान्य बाळ गंगाधर टिळक) आणि पाल (बिपिन चंद्र पाल) यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इतिहास घडवला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र-पंजाब संबंध अधिक दृढ झाले असले तरी महाराष्ट्र-बंगाल संबंध अधिक विकसित होऊ शकलेले नाहीत. हे संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीनिमित्त महाराष्ट्र-बंगाल मैत्रीचा नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरहदचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार म्हणाले, 'भाषा, साहित्य, कला, नाट्य, चित्रपट, शिक्षण, संस्कृती या क्षेत्रातील मान्यवरांच्या वैयक्तिक लोक-लोक संपर्कांवर या वर्षी भर दिला जाणार आहे.  दोनही राज्यांत विविध कार्यक्रम आयोजित करून लोक चळवळ सुरू केली जाईल. त्यासाठी दोन्ही राज्यातील लेखक, कवी, नेते आणि कलाकार यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. आम्ही पंजाबी, बंगाली आणि मराठी भाषेतून सुमारे ५० पुस्तकांचे भाषांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.'

…..............

ममता बॅनर्जी, कॅप्टन अमरिंदरसिंग, उद्धव ठाकरे या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह लाला लाजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांचे वंशज अनुक्रमे अ‍ॅड. अनिल अग्रवाल, शैलेश आणि डॉ. दीपक टिळक आणि दीप पाल यांची उपस्थिती असणार आहे. या काळात तीन स्वातंत्र्यसैनिकांचे वंशजही विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. १ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम सुरू होईल आणि योगी श्री अरबिंदो घोष यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 15 ऑगस्ट २०२२ पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. 

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाwest bengalपश्चिम बंगालMaharashtraमहाराष्ट्रliteratureसाहित्य