शतावरी, अश्वगंधा लागवड करण्यास सांगून शेतकऱ्यांसह गुंतवणुकदारांची तब्बल '२३ कोटींची' फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 01:50 PM2021-09-16T13:50:22+5:302021-09-16T13:53:23+5:30

शुन्य हर्बल अग्रो डेव्हलपमेट प्रा. लि.च्या ऋषिकेश पाटणकरला अटक

Farmers, investors cheated of Rs 23 crore by asking them to plant asparagus and ashwagandha | शतावरी, अश्वगंधा लागवड करण्यास सांगून शेतकऱ्यांसह गुंतवणुकदारांची तब्बल '२३ कोटींची' फसवणूक

शतावरी, अश्वगंधा लागवड करण्यास सांगून शेतकऱ्यांसह गुंतवणुकदारांची तब्बल '२३ कोटींची' फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांना ५० हजार जमा करण्यास सांगून कंपनीनं दिली विविध आश्वासनं

पुणे : शतावरी आणि अश्वगंधा य औषधी वनस्पतींची शेतात लागवड करुन येणारं पिक एकरी ३ लाख रुपये मोबदला देऊन विकत घेण्याचे आश्वासनं दिलं.  तसेच गुंतवणुकदारांना आयुष मंत्रालयाचा संदर्भ देऊन गुंतवणुक करण्यास भाग पाडून २३ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेतील आर्थिक गुन्हे शाखेनं एकाला अटक केली आहे.

ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर (वय ३८, रा. आकाशदीप सोसायटी, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शहा (वय ४६, रा. जयराज किरण सोसायटी, वाळवेकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पाटणकर यानं तीन वर्षांपूर्वी शुन्य हर्बल अग्रो डेव्हलपमेट प्रा. लि. या  कंपनीची स्थापना केली. त्यानं असंख्य शेतकरी आणि गुंतवणुकदार यांना शतावरी आणि अश्वगंधा या औषधी वनस्पतीची त्यांचे शेतात लागवड करावी, असं सांगितलं. येणारं पिक स्वत: विकत घेऊन त्यांना दरवर्षी एकरी ३ लाख रुपये मोबदला देण्याचं आमिष दाखवलं.  तसेच त्यासाठी एकेरी ५० हजार रुपये कंपनीकडे जमा करायचे.

कंपनी शेतकर्‍यांना रोपं देणारं, त्यांची लागण ते स्वत: करणार, सुपर व्हिजन करणार, खते देणार, एक वर्षांनी कंपनी स्वत: काढणी व वाहतूक करुन शेतकर्‍यांना जागेवर पैसे देणार अशी भरघोस आश्वासनं दिली. त्यानुसार सोलापूर सह अनेक जिल्ह्यातील असंख्य शेतकर्‍यांनी आपल्या शेतात कंपनीकडून रोपं घेऊन लागवड केली. त्यानंतर १८ महिन्यांनी त्यांनी मालही काढून नेला. परंतु, शेतकर्‍यांना पैसे मात्र दिले नाही. गेले दीड -दोन वर्षे शेतकरी पुण्यात अरण्येश्वर येथील कंपनीच्या कार्यालयात पैशांसाठी हेलपाटे मारत होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचीही शेतकर्‍यांनी भेट घेतली.

तरीही काही उपयोग न झाल्याने शेवटी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भेटून शेतकर्‍यांनी आपली हकीकत सांगितली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास करुन ऋषिकेश पाटणकर याला अटक केली आहे. त्याने अशा प्रकारे असंख्य शेतकरी आणि गुंतवणुकदार यांची सुमारे २३ कोटी ४५ लाख १ हजार ९९४ रुपयांची फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेने ऋषिकेश पाटणकर याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सहाणे अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Farmers, investors cheated of Rs 23 crore by asking them to plant asparagus and ashwagandha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.