शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पुण्यातील धरणे १०० टक्के भरली; मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु, नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:03 IST

जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्यात तब्बल चार महिन्यांतील पाऊस पडला आहे

पुणे : गेल्या तीन- चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली असून, खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी, सिंहगड रोड परिसरातील अनेक भागांमध्ये रविवारी (दि.४) पाणी शिरले. बऱ्याच इमारतींच्या पार्किंग पुराच्या पाण्याने भरल्याने नागरिक अडकून पडले आहेत. नागरिकांना मदतकार्यासाठी लष्कराचे जवान, अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात केले आहेत. जवानांनी बोटीच्या माध्यमातून पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. पावसाचा जोर वाढल्याने पुण्यातील आणखी काही भागांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज दिला होता. तो खरा ठरत असून, जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्यात तब्बल चार महिन्यांतील पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला असून, पावसाचा जोर मात्र वाढतच आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली आहेत. उजनी धरणदेखील शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. पुणे शहरात आणि घाटमाथ्यावर पावसाची हजेरी कायम आहे. आणखी एक- दोन दिवस असाच पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी- रविवारी तर पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार रविवारी सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्गही वाढविण्यात आला. रविवारी सायंकाळी ५ वाजता तर ४५ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. तत्पूर्वी, दुपारी सिंहगड परिसरातील अनेक भागांत पाणी शिरले. अनेक नागरिक इमारतींमध्ये अडकून पडले. त्यांना अग्निशमन दलाचे आणि लष्कराचे जवान सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत होते. हवामान विभागाने शहरात आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ६ ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सद्यस्थितीत खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ३५ हजार ९४८ क्युसेक विसर्ग कमी करून दुपारी १२ वाजता २१  हजार १७५ क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो असे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. 

पुणे शहर आणि घाटमाथ्यावर गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पूर्ववाहिनी नद्याही भरून वाहत असून, धरणे भरली आहेत. घाटमाथ्यावरील पावसाचे पाणी थेट खाली येते. पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली आहेत. अजून दोन दिवस पुण्यात पावसाचा अंदाज आहे. ६ ऑगस्टनंतर हळूहळू पाऊस कमी होईल. -माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ, पुणे

घाटमाथ्यावरील रविवारचा पाऊस

लोणावळा : १८१ मिमीवाळवण : १५७ मिमीभिवपुरी : ४४ मिमीमुळशी : ५२ मिमी

पुण्यातील रविवारचा पाऊस

माळीण : ४२.५ मिमीवडगावशेरी : ३९.५ मिमीशिवाजीनगर : ३७ मिमीचिंचवड : ३६. ५ मिमीपाषाण : ३४.१ मिमीतळेगाव : २८.५ मिमीराजगुरूनगर : १६.५ मिमीआंबेगाव : १४ मिमीहडपसर : १३ मिमीएनडीए : ७.५ मिमीहवेली : ११.५ मिमी

अवघ्या १० दिवसांत उजनी भरले!

उजनी धरणसाठा २५ जुलैपर्यंत उणे पातळीत होता; पण अवघ्या १० दिवसांतच हे धरण १०० टक्के भरले. कदाचित सोमवारी ते शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. अवघ्या ९ दिवसांत उजनी धरणात ४५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी उणे झालेले उजनी धरण आता भरणार आहे, तसेच पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे आता ९० टक्क्यांच्या पुढे गेली आहेत.

उजनीमुळे चार जिल्ह्यांना दिलासा!

सध्या उजनीत १०७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, एकूण क्षमता ११७ टीएमसी आहे. धरणात दौंडवरून पाण्याची आवक येत आहे. उजनी धरणावर पुणे, नगर, धाराशिव व सोलापूर, अशा चार जिल्ह्यांच्या ४२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

धरणांतील पाणीसाठा

खडकवासला : ७२.१७ टक्केटेमघर : १०० टक्केपाणशेत : ९२.३३ टक्केवरसगाव : ९१.०३ टक्के

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसenvironmentपर्यावरणNatureनिसर्गHomeसुंदर गृहनियोजनFire Brigadeअग्निशमन दल