शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 00:28 IST

Nitin Gadkari Latest news: ‘एस. एन. विनोद – ८५ वर्षांची अनंत यात्रा’ या स्मारिकेचे प्रकाशन आणि सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते.

नागपूर : देशात काँग्रेसचे सरकार होते आणि मंचावर त्यावेळी काँग्रेसचे खासदार तसेच लोकमत एडिटोरियल बोर्डचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा उपस्थित होते. एस. एन. विनोद यांनी त्यावेळी सरकारच्या त्रुटींवर प्रकाश टाकला होता. त्यातून लोकमत व्यवस्थापनाचा निष्पक्षपणा आणि एस. एन. विनोद यांच्या परखड पत्रकारितेचा प्रत्यय यावा, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.

‘एस. एन. विनोद – ८५ वर्षांची अनंत यात्रा’ या स्मारिकेचे प्रकाशन आणि सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशासमोर विचारभिन्नता ही समस्या नाही. पत्रकारांमध्ये निर्माण होत असलेली विचारशून्यता लोकशाहीसाठी घातक आहे. 

एस. एन. यांच्या बेधडक पत्रकारितेचे कौतूक करताना गडकरी म्हणाले, आणीबाणीच्या काळात विनोदजी यांनी आपल्या संपादकीय लेखांमधून सरकारविरुद्ध बिनधास्त मतप्रदर्शन केले. त्यांनी ‘ बरोबर ते बरोबर आणि चुकीचे ते चुकीचे’ असे ठामपणे मांडत त्यांनी सरकारला आरसा दाखवला. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकाराचे हेच मुळ कर्तव्य आहे. आज देशाला निर्भीड आणि बेधडक पत्रकारितेची गरज आहे, असे म्हणत गडकरी यांनी एस. एन. विनोद यांच्या दिवंगत पत्नींचाही भाषणातून उल्लेख केला.

शनिवारी सायंकाळी प्रेस क्लबमध्ये आयोजित या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वनराईचे विश्वस्त डॉ. गिरिश गांधी, तर अतिथी म्हणून प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना एस. एन. विनोद यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांनी आपल्याला ‘लोकमत समाचार’च्या संपादकपदाची जबाबदारी दिली. तुमच्या कामात कोणताही हस्तक्षेप होणार नाहीत, असा शब्दही त्यांनी दिला होता.

बाबूजी आणि त्यांच्यानंतर एडिटोरियल बोर्डचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. विजय दर्डा आणि लोकमतचे एडिटर ईन चिफ राजेंद्र दर्डा यांनीही हा शब्द पाळला. त्यांच्यामुळेच आपल्याला निष्पक्ष पत्रकारिता करण्याची संधी मिळाल्याचे एस. एन. विनोद यांनी सांगितले.

१०० कोटींचा दावा अन्...

एका लेखावरून १०० कोटींचा दावा लोकमतवर करण्यात आला. त्यावेळीदेखिल आपल्या पाठीशी बाबूजी आणि लोकमतचे व्यवस्थापन भक्कमपणे उभे होते. यामुळेच आपण परखड पत्रकारिता करू शकलो, असेही एस.एन. यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी म्हणाले, पूर्वीच्या काळात वृत्तपत्रांना त्यांच्या संपादकांच्या लेखनावरून ओळख मिळायची. ‘लोकमत’ला त्यांचे पहिले संपादक पद्मश्री पा. वा. गाडगीळ आणि ज्येष्ठ संपादक म. य. उपाख्य बाबा दळवी यांच्या संपादकीयांमुळे तर ‘लोकमत समाचार’ला एस. एन. विनोद यांच्या लेखांमुळे स्वतंत्र ओळख मिळाली.

प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांची गरज

ज्येष्ठ पत्रकार आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून कार्यक्रमाची भूमीका मांडली. तर, ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांनी पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याबद्द्ल चिंता व्यक्त करून आज देशाला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार पूर्णिमा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांनी केले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Fearless journalism needed today: Union Minister Nitin Gadkari's opinion.

Web Summary : Nitin Gadkari emphasized the need for fearless journalism, praising S.N. Vinod's bold reporting during the Emergency. He highlighted Vinod's commitment to truth and the importance of unbiased journalism for a strong democracy, recalling Lokmat's support for independent reporting.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरPoliticsराजकारणMediaमाध्यमे