शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 08:04 IST

हवेतील बाष्प वाढल्याने मुंबईकर पुन्हा घामाघूम होऊ लागले असून, दिवसाचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर रात्रीचे किमान तापमान २६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: हवेतील बाष्प वाढल्याने मुंबईकर पुन्हा घामाघूम होऊ लागले असून, दिवसाचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर रात्रीचे किमान तापमान २६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. रविवारपर्यंत कमाल व किमान तापमान स्थिर राहणार असून, हवेतील बाष्पही कायम राहणार असल्याने मुंबईकरांच्या त्रासात भरच पडणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रही तापला असून, शुक्रवारी येथे अकोला ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.   

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य भारतासह महाराष्ट्रातील अंतर्गत भागांमध्ये काही दिवसांत हवामानात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यानंतर म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्य भारतातील बहुतांश भागांमध्ये, विशेषतः महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात, रात्रीच्या तापमानात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर हळूहळू किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोकण पट्ट्यात तापमानाचा दिलासा मर्यादित राहण्याची शक्यता आहे. 

रविवारपर्यंत अवकाळीची शक्यता

२६ एप्रिलपर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. महामुंबईतही पाऊस अपेक्षित आहे. रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली असून, दिवसा मुंबईत हवेत अधिक बाष्प आहे. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण अधिक असून, रविवारपर्यंत असेच हवामान राहील, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेटटी यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Sweats, Vidarbha Scorches; Akola at 45°C, Rain Expected!

Web Summary : Mumbai grapples with humidity as Vidarbha faces extreme heat, Akola reaching 45°C. Relief expected in inland Maharashtra by May's first week. Konkan and central Maharashtra anticipate unseasonal rains until April 26th, including Mumbai. Persisting humidity will continue.
टॅग्स :Heat Strokeउष्माघातMumbaiमुंबई