शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 00:15 IST

Marathi Schools: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पाटील यांचा सत्कार सोहळा शनिवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला.

ठाणे : “शासनाने मराठी शाळांसाठी किमान पटसंख्या सांगू नये. एक विद्यार्थी जरी वर्गात असेल, तरी त्या विद्यार्थ्याला शिकवले पाहिजे. मराठी शाळेची तुकडी चालली पाहिजे. कुणास ठाऊक, त्या एका विद्यार्थ्यातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर घडतील!” असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी ठाण्यात केले.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पाटील यांचा सत्कार सोहळा शनिवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला. ते म्हणाले की, “मराठी भाषा अशा टप्प्यावर आहे, जिथे तिचे साहित्य आणि संस्कृती कधी नव्हे ते धोक्याच्या रेषेवर गेली आहे. जशी आपण आजारी आईची काळजी घेतो, तशीच काळजी आपण मराठी भाषेची घेतली पाहिजे. ती उराशी जपली पाहिजे, संवर्धन केले पाहिजे. शासनाकडून मदत मिळाली तर ती घ्यावी, पण भाषेचे रक्षण हे लोकांनीच करायचे असते कारण हा लोकांचा उठाव आहे.” 

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान दोन ते तीन मराठी भवन उभारले पाहिजेत. मात्र त्याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहू नये. पूर्वी जशा जिल्हा परिषदेच्या शाळा उन्हापावसापासून संरक्षित असायच्या, तशाच भावनेने ही भवनं उभी केली पाहिजेत.” 

त्यांनी सुचवले की, “ज्येष्ठ नागरिक, ज्यांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत, ते आपली जागा मराठी भवनासाठी देण्यास तयार आहेत. अशा व्यक्तींना भेटून संवाद साधावा. प्रत्येक मराठी भवनात लहानसे ग्रंथालय असावे. नाना-नानी पार्कमध्ये फक्त फिरायला पाठवण्याऐवजी त्यांना मराठी भवनात सहभागी करून घ्या. त्यातून भाषेचे आणि संस्कृतीचे जतन होईल.” 

पाटील म्हणाले, “जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारी मुले अत्यंत बुद्धिमान असतात. महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले बहुतांश शास्त्रज्ञ हे अशाच मराठी माध्यमातील शाळांत शिकलेले आहेत. माझ्या काळात दहा-पंधरा विद्यार्थ्यांची मर्यादा घालण्यात आली असती, तर मीसुद्धा आज येथे नसतो. त्यामुळे शिक्षणासाठी संख्या नव्हे तर गुणवत्ता महत्त्वाची आहे.”

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Medium Must Continue Even With One Student: Patil

Web Summary : Vishwas Patil advocates for Marathi schools, emphasizing quality over quantity. He urges community involvement, Marathi Bhawans in every taluka, and utilizing senior citizens' expertise to preserve Marathi language and culture. He highlights the success of Zilla Parishad school alumni.
टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनmarathiमराठीthaneठाणे