शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार गायबच! त्यांनी पुण्यातून कारभार चालवावा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 14:22 IST

केंद्रांनी सर्वाधिक रेमडेसीवीर महाराष्ट्राला दिले. आणखी साठी मी भीक मागायला तयार: पाटील

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे गायबच होते, असा दावा भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अजित पवारांनी पुण्यात शिफ्ट व्हावे आणि इथून कारभार चालवावा किंवा पालकमंत्री पद दुसऱ्या कोणाला तरी द्यावे असेही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार हे गायब असल्याचा दावा केला होता. त्यानंतर अजित पवारांनी पत्रक काढत भाजप नेत्यांवर टीका केली होती आणि मी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असतो. तसेच भाजप चे नेते देखील मला भेटत असतात असा दावा केला होता. याबाबत बोलताना पाटील यांनी पुन्हा हा दावा केला आहे. 

पुण्यामध्ये शुक्रवारी ( दि. २३) चंद्रकांत पाटील यांचा हस्ते कोविड केअर सेंटर चे उदघाटन झाले. एसएनडीटी कॉलेज मध्ये हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. १०० बेड चे हे केंद्र विलगीकरणासाठी उपयोगी ठरणार आहे. या उद्घाटनानंतर पाटील बोलत होते. 

अजित पवारांचा वक्तव्याबाबत पाटील म्हणाले " देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणीही काहीही बोलू शकते. पण मी चॅलेंज केले होते की, अजित पवारांना फोन लावून द्या, कारण ते गायबच होते. २४ तास ते कोणालाच उपलब्ध झाले नव्हते. अजित पवारांच्या कार्यक्षमतेबद्दल माझा मनात शंका नाही. पण वाढत असलेला कामाचा व्याप पाहता मला असा वाटतं की, त्यांनी एकतर पुण्यातून किंवा मुंबईतून कारभार चालवावा. आणि पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा. पण एकूण गरज लक्षात घेता त्यांनी पुण्यातून कारभार चालवायला पाहिजे आणि पुण्यात सहज उपलब्ध व्हायला हवे. लोकांना आता दिलासा हवा आहे." 

दरम्यान. रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत राजेश टोपे यांनी केलेल्या दाव्याबद्दल पाटील म्हणाले " ग्लास अर्धा भरला आहे असाही म्हणता येतं किंवा रिकामा आहे असेही म्हणता येतं. महाराष्ट्र सरकारने त्यांचं अपयश लपवण्यासाठी सारखे केंद्राकडे जायचे ठरवलंय. नाहीतर तो चार्ट पहिला तर सगळ्यात जास्त इंजेक्शसन ही महाराष्ट्राला मिळाली आहेत. १० दिवसांसाठी.तब्बल २ लाख ६९ हजार इंजेक्शन्स दिली आहेत.  ज्या गुजरातच्या नावाने आरडाओरडा होतो त्यांना पण १ लाख ४० हजार मिळाली आहेत. 

रेमडेसिवीर मिळत नसल्याचा दावा करत पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आपण एक कोटी रुपये घेऊन अजित पवारांच्या टेबलवर ठेवा असं सांगितल्याचे ही पाटील म्हणाले. " मी एक घोषणा करतो. महापालिका आणि सरकार ला अ‍ॅडव्हान्स पैसे देता येत नाहीत. तर जो डिस्ट्रिब्युटर अ‍ॅडव्हान्स पैसे मागेल त्याला भीक मागून पैसे गोळा करून मी देणा आहे. त्यांचे मिळाले की मला परत द्यायचे. मी मागितले की भीक जास्त मिळते. १०० कोटींचे इंजेक्शन घेऊ. संपूर्ण महाराष्ट्रात मी अ‍ॅडव्हान्स द्यायला तयार आहे"

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलcorona virusकोरोना वायरस बातम्या