शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन स्थळांवर जीवघेणे अपघात; आता फिरायला जायचं कुठं? 'या' ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

By श्रीकिशन काळे | Updated: July 4, 2024 14:34 IST

पर्यटन स्थळांवर बंदी हा अपघात रोखण्यासाठीचा उपाय होऊ शकत नाही, जबाबदारी झटकून टाकण्याची ही पळवाट, निसर्गप्रेमींचे मत

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पर्यटन स्थळांवर अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. त्या दृष्टीने वन विभागाच्या वतीने किल्ले सिंहगड, ताम्हिणी घाट, भीमाशंकर अभयारण्य आदी ठिकाणांवर पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यामुळे पावसाळा असूनही पर्यटकांना फिरण्याचा आनंद लुटता येणार नाही. पण गर्दीवरील नियंत्रण ठेवून पर्यटन सुरू ठेवायला हवे, अशी मागणी देखील होत आहे.

सध्या पाऊस चांगलाच सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु, योग्य काळजी न घेता व्हिडिओ काढण्याच्या नादात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. परिणामी प्रशासनाला सर्व ठिकाणांवर बंदी घालावी लागली आहे. गेल्या महिनाभरात कळसुबाई शिखरावर दोन वेळा पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. मागील रविवारी तर एका पर्यटकाचा ह्रदयविकाराने मृत्यू देखील झाला आहे. तोरणा किल्ल्यावरही एका पर्यटकाचा जीव गेला. तसेच ताम्हिणी अभयारण्यातील दोन धबधब्यांमध्ये तीन पर्यटक वाहून गेले. भुशी धरणाच्या धबधब्यावर पाच जण वाहून गेल्याचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला. या घटनांवरून पर्यटन स्थळांवरील गर्दी नियंत्रिण करणे आवश्यक बनले आहे. तसेच पर्यटकांनी देखील पर्यटन करताना योग्य भान ठेवणे गरजेचे आहे.

विधानसभेतही प्रश्न !

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुव्यवस्था दिसून येत नाही. त्या ठिकाणच्या व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे, अशी मागणी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली आहे.

सरसकट बंदी नको !

दरवर्षी हरिश्चंद्र गडावर, किल्ले सिंहगड, राजगड, सांदण व्हॅली, हरिहर गड, तोरणा येथे गर्दी होते. त्या ठिकाणचे अपघात टाळायचे असतील तर गर्दीवर नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी, लोणावळा, ताम्हिणी भागातले धबधबे पाहण्यासाठी गर्दी होते. पण तिथे वन विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे या सरसकट बंदीवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. ज्यांचा पर्यटनावर व्यवसाय आहे, त्यांची याविषयी मागणी आहे.

पर्यटन स्थळांवर गर्दी होत आहे. अनेक अपघात झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच पर्यटन स्थळांवर निर्बंध आणले आहेत. किल्ले सिंहगडावर १४४ कलम लागू असून, जमावाने जाण्यावर बंदी आहे. - प्रदीप संकपाळ, वनपरीक्षेत्र अधिकारी

वन विभागाच्या अंतर्गत अनेक किल्ले व पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन येताना स्वत:च्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य द्यावे. वन्यजीव क्षेत्रात रात्री जाऊ नये, प्राण्यांना त्रास देऊ नये. धोकादायक ठिकाणी जाऊ नये. अन्यथा आम्ही कठोर कारवाई करू. - महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग


पर्यटन स्थळांवर बंदी हा अपघात रोखण्यासाठीचा उपाय होऊ शकत नाही. जबाबदारी झटकून टाकण्याची ही पळवाट आहे. जंगलातले कायदे मोडून वाघ दाखवणाऱ्यांना, शिक्षा न करता, सफारीच बंद करण्यासारखे आहे. होमगार्डसची मदत घेऊन, प्रवेशाच्या वेळी सक्त ताकीद देऊन, मोठ्या दंडाची/शिक्षेची भिती घालावी, पर्यटकांना सुरवातीलाच शिस्त लावावी. जे खरेच निसर्गप्रेमी आहेत, त्यांना या बंदीमुळे वंचित राहावे लागणार नाही. - सीमा देवधर, निसर्गप्रेमी

घरातून बाहेर पडताना ज्या स्थळी जायचे आहे, त्या स्थळापासून आपल्याला काय हवे आहे ह्याचा विचार करावा. सिंहगडला हजारो लोकं जातात, ते तिथे केवळ भाकरी पिठलं, भजी खायला अन् पाऊस, वारा अनुभवायला जातात. तसेच सेल्फी, रील्स काढतात. तिथला इतिहास किती जण जाणून घेतात. काजवा महोत्सवात काजवे मारायचे, कास पठारावर फुले मारायची, किल्ल्यांवर दारू पार्ट्या करायच्या, रिल काढायला वाटेल तिथे, वाटेल तसे जायचे, आणि मग पोलीस, वनविभाग ह्यांना कामाला लावायचे. हे कसले पर्यटन ? खरंतर जबाबदारीने पर्यटन करण्यासाठी एक व्यवस्था तयार व्हावी. पर्यटकांनी योग्य भान ठेवून फिरावे. - केदार पाटणकर, संस्थापक, ट्रास टॉक ग्रुप (किल्ले स्वच्छता मोहिम)
 

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटनsinhagad fortसिंहगड किल्लाcollectorजिल्हाधिकारीenvironmentपर्यावरणFortगडNatureनिसर्गRainपाऊस