शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

"३१ मे लक्षात ठेवा! तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 17:26 IST

संजय गायकवाड यांच्या विधानानंतर अनेक वारकरी संप्रदायातील लोकांनी फोन करून त्यांचा निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देतुम्ही सगळ्या महाराजांनी वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे वेळ नाही. सध्याची महामारी आणि कठोर निर्बंध पाहता तुम्ही सर्वांनी ठरवून एक दिवस सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर बसून संवाद साधू, शिवसेनेला आणि आपल्याला बदनाम करण्याचे हे भाजपच्या वारकरी सेलचे षडयंत्र आहे

बुलडाणा – शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनासंदर्भात संजय गायकवाड यांची स्थानिक वृत्तपत्रात बातमी छापून आली होती. यावरून वारकरी संप्रदायात नाराजी पसरली. मांसाहार केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढेल, कोरोनातून तुम्हाला देव वाचवायला येणार नाही असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले होते.

संजय गायकवाड यांच्या विधानानंतर अनेक वारकरी संप्रदायातील लोकांनी फोन करून त्यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी संजय गायकवाड यांनी कथित ऑडिओ क्लीपमध्ये वारकऱ्यांना गर्भित इशारा दिल्याचं ऐकायला मिळतं. या ऑडिओ क्लीपमधील आवाज संजय गायकवाड यांचाच असल्याचा दावा केला जातो. संजय गायकवाड म्हणतात की, तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. पण मी रोज २०-२५ जणांच्या अस्थी जाळू लागलो, तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहित्येय, पण मी जे बोललो ते वास्तव आहे. मी पण नास्तिक नाही परंतु काळाची गरज आहे ते बोललो. तुम्ही सगळ्या महाराजांनी वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही सगळे एकत्र या मग बघू. आमचं लॉकडाऊन ३० मे ला उठतंय, ३१ मे ला तुम्ही सिंदखेडराजाला या मग आमनेसामने बघू काय होतं? असंही संजय गायकवाड बोलत असल्याचं ऐकायला मिळत आहे.

“उपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा”; कोरोनाकाळात देवही वाचवायला येणार नाही”

मुलाखतीत काय म्हटलं होतं?

कोरोनाकाळात मंदिरंही बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यायची आहे. त्यामुळे उपास तापास बंद करा, रोज ४ अंडे खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त भरपूर खा असा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे.

मला फोन करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याशी मी बोलू शकत नाही. सध्याची महामारी आणि कठोर निर्बंध पाहता तुम्ही सर्वांनी ठरवून एक दिवस सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर बसून संवाद साधू, असे मला फोन करणाऱ्यांना मी सांगितले.  शिवसेनेला आणि आपल्याला बदनाम करण्याचे हे भाजपच्या वारकरी सेलचे षडयंत्र आहे - संजय गायकवाड, शिवसेना आमदार, बुलडाणा

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडShiv Senaशिवसेनाcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा