शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

...तर मंत्री जयंत पाटील आज भाजपत असते, नारायण राणेंचा खळबळजनक दावा

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 30, 2020 9:54 PM

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशासंदर्भात बोलताना नारायण राणे यांनी हा गौप्यस्फो केला. यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरू झाली आहे.

रत्नागिरी - भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नसते, तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशासंदर्भात बोलताना नारायण राणे यांनी हा गौप्यस्फो केला. यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरू झाली आहे.

पत्रकारांशी बोलताना एका प्रश्नावर राणे म्हणाले, जयंत पाटील या आणि पुढची पाच वर्षेही आपणच मंत्री असू, असं म्हणाले असतील. कारण, आता भाजपचे सरकार असते तर जयंत पाटील मंत्री असते. तशी तयारीही त्यांनी दर्शवली होती. एढेच नाही, तर भाजपमध्ये येण्यासंदर्भात त्यांची बोलणीही भाजपच्या नेत्यांशी झाली होती. काही गोष्टींसाठी ते थांबले होते. अन्यथा ते आज भाजपमध्ये असते, असा दावा राणे यांनी केला आहे. याच बरोबर जयंत पाटील हे माझ्यासंदर्भातही बोलले आहेत. मात्र, मी त्यांचा समाचार इस्लामपुरात जाऊन घेईन, असा इशाराही राणे यांनी पाटलांना दिला आहे. 

अपयशी सरकार -यावेळी महाविकास आघाडीवर बोलताना राणे म्हणाले, सरकार या वर्षात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या सरकारने जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? असा सवालही राणे यांनी यावेळी केला. तसेच, राज्यात केवळ दडपशाही सुरू आहे. सुशांतचा खून झाला. मात्र, मंत्र्यांना वाचविण्यासाठी, ती आत्महत्या असल्याचे हे सरकार दाखवत आहे, असा गंभीर आरोपही राणे यांनी राज्य सरकारवर केला यावेळी केला.

कोरोनाच्या नावाखाली ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार-नारायण राणे - कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. आपल्या सरकारने वर्षपूर्ती केल्याची मुलाखत देताना त्यांनी वर्षभरात सरकारने काय ठोस केले, याची माहितीही देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी काही केलेलेच नाही. कोरोनावरील उपाययोजनांसाठी सरकारने १२ हजार कोटी खर्च केल्याचे मुख्यमंत्री सांगतात. त्यातील असंख्य कामे आपल्याच नातेवाईकांना देऊन सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

हक्काचे 16 टक्के आरक्षण हवे - मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना राणे म्हणाले, आम्हाला कोणतीही तडजोड नको. कुणाच्या वाट्याचेही आरक्षण नको. आम्हाला केवळ आमच्या हक्काचे 16 टक्के आरक्षण हवे आहे. असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा