शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले; राऊतांचा गौप्यस्फोट

By कुणाल गवाणकर | Published: November 29, 2020 9:21 AM

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण; 'रोखठोक'मधून संजय राऊतांचे गौप्यस्फोट

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षी ३७ दिवस राज्यात सत्तानाट्य सुरू होतं. या कालावधीत राजकारणातील डाव-प्रतिडाव राज्यानं पाहिले. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेनं सोडलेली भारतीय जनता पक्षाची साथ, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळवलेला हात, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी, अजित पवारांनी राजीनामा, फडणवीस यांचं कोसळलेलं सरकार आणि उद्धव ठाकरेंचा शीवतीर्थावरील शपथविधी अशा उत्कंठावर्धक घटना या सत्ता नाट्यात घडल्या. या संपूर्ण घटनाक्रमाला वर्ष उलटत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून काही गौप्यस्फोट केले आहेत.संजय राऊतांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावाराज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधणारे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या सातत्यानं संपर्कात होते. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात झालेल्या एका बैठकीत नेमकं काय घडलं होतं, याची माहिती राऊत यांनी त्यांच्या लेखात दिली आहे. कंगना रणौत प्रकरण: महापालिकेची कारवाई बेकायदेशीर कशी?, हे मी शोधतोय; राऊतांची प्रतिक्रिया'शरद पवार व माझ्यात ३५ दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. १७ नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले, ''तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?'' तेव्हा ''आमचा आकडा १७० आहे'' असे मी सांगितले. त्या १७० आकड्याची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या २२ नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे श्री. पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला,' असं राऊत यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे.मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी केलेलं 'ते' विधान ऑन रेकॉर्ड आहे; संजय राऊतांचं प्रत्युत्तरराष्ट्रवादी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास उत्सुक होती. त्यासंदर्भात त्यांची दिल्लीत अमित शहांसोबत बैठकही झाली होती, असा दावा नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'ट्रेडिंग पॉवर' पुस्तकात करण्यात आला. मात्र राऊत यांनी हा दावा खोडून काढला आहे. 'अजित पवारांचा फोन नेहरू सेंटरमधील बैठकीनंतर 'स्विच ऑफ' झाला व दुसऱया दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले. फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, ''तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले आहे.'' मी त्याक्षणीही सांगितले, ''चार वाजेपर्यंत थांबा. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वतः अजितदादाही गुदमरून परत फिरतील.'' हे यासाठीच सांगायचे की, पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली अशा प्रकारच्या गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधीचे 'नाट्य' तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे,' असा दावा राऊत यांनी केला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार