शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, टक्केवारीपासून पूजा चव्हाणपर्यंत; विधानसभेत नीतेश राणेंकडून ठाकरे सरकारवर घणाघात, केले गंभीर आरोप

By बाळकृष्ण परब | Updated: March 6, 2021 10:58 IST

Nitesh Rane lashes out at Thackeray government in Assembly : राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीदरम्यान झालेला भ्रष्टाचार, राज्यातील कायदा सुव्यवस्था, टक्केवारीचे गणित यापासून ते सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत विविध विषयांवरून नितेश राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली

मुंबई - विधानसभेमध्ये काल विरोधी पक्षाने आणलेल्या २९३ प्रस्तावावर बोलताना भाजपा आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीदरम्यान झालेला भ्रष्टाचार, राज्यातील कायदा सुव्यवस्था, टक्केवारीचे गणित यापासून ते सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत विविध विषयांवरून नितेश राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. (Corona, Percentage to Pooja Chavan; Nitesh Rane lashes out at Thackeray government in Assembly)

यावेळी सभागृहात नीतेश राणे म्हणाले की, अर्थसंकल्पातून जास्त अपेक्षा ठेवू नये, असं सरकार सांगतंय. राज्यासमोर आर्थिक संकट आहे असं सरकार सांगतंय. पण हे आर्थिक संकट केवळ शेतकरी आणि कामगारांसांठीच आहे का. पण सरकारमध्ये बसलेले लोक राजरोसपणे लूट करताहेत. भ्रष्टाचार करताहेत. त्याबाबतही विचार झाला पाहिजे. कारण हे आर्थिक संकट केवळ सामान्य लोकांसाठी आहे. सरकारकडून राजरोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे. त्याबाबत कुणी बोलत नाही. सरदेसाईंसारख्या व्यक्तींना सरकार का पाठिंबा देतंय. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत राजरोजपणे का फिरतात. ते कंत्राटदारांना फोन का करतात. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का दिली जातेय. 

बीकेसीमधील वैभव चेंबर्स नावाच्या इमारतीत अधिकारी का जातात. जम्बो कोविड सेंटरबाबत उल्लेख केला जातोय. याबाबत अमित साटम यांनी पुस्तिकाच प्रकाशित केलीय. जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. मुंबईमध्ये नाईट लाइफ नावाची गँग कार्यरत आहे. डिनो मोरिया सरकारचा जावई आहे का? मनपा आणि सरकारमधील कुठलंही काम असल्यास करुन देतो म्हणून सांगतो, त्याला अधिकार कुणी दिलेत असा सवाल नीतेश राणेंनी केला. 

राज्यातील सरकारचे ५ आणि ८ हे आवडते आकडे आहेत. पाच आणि आठच्या पुढे जात नाहीत. जोपर्यंत हे आकडे येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही, असं ठरलंय. आता हे पाच दिवस आहेत. पाच तास आहेत की पाच टक्के आहेत. ते आता तुम्हीच ठरवा, पण हे आपल्या राज्यात चाललंय, असा आरोपही नितेश राणेंनी केला. 

यावेळी राज्याला एक परिवहन मंत्री द्या, अशी मागणी करत नितेश राणेंनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. अध्यक्ष महोदय, राज्याला एक परिवहनमंत्री द्या, राज्याला परिवहन मंत्री नाही. आहेत ते परिवार मंत्री बनले आहेत. ते कलानगरच्या अवतीभवती घुटमळत असतात. कलानगरच्या बाहेर पडावे, मंत्रालय आहे, एसटी कामगार आहेत, त्यांचा पगार आहे, त्यात लक्ष घाला, असा सल्ला राणेंनी दिला. 

आमच्या आमदारांना धमकीचे फोन येतात. त्याची चौकशी होत नाही. चित्रा वाघ यांच्या वाहनामागे एक वाहन पाळतीवर असते. आता कुणी धमक्या दिल्यानंतर कारवाई होत नसेल. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था हाती घेतली तर आमच्यावर केस करायच्या नाहीत. काही बोललं की जुन्या केस उकरून काढल्या जाता. अशी केस आहे तशी केस आहे सांगितलं जातं. पण जूनं बोलायचं तर आमच्याकडे खूप आहे. तुमच्यासोबत ३९ वर्षे काढली आहेत. पण आम्हालाही बाळासाहेबांची शिकवण माहिती आहे, अंगावर आले तर शिंगावर घ्या. त्यामुळे जुन्या गोष्टींची आठव थांबावायचा प्रयत्न केला तर मग सोनू निगम पण निघेल आणि आणखी काही निघेल, हे लक्षात ठेवा, असा सूचक इशाराही नीतेश राणेंनी दिला.  कायदा दुसऱ्यांना लागू आहे तोच अन्य लोकांना लागला पाहिजे. पूजा चव्हाण काय प्रकरण आहे. ११ की १२ ऑडिओ क्लिप आहेत. त्यातून बरेच काही स्पष्ट होते. तरी १०-१२ दिवस लागतात बाहेर पडण्यासाठी एवढे दिवस का लागतात, शक्तिप्रदर्शन करण्यासाठी का. ते शक्तिप्रदर्शन कुणाला घाबरवण्यासाठी होतं. राज्यातील जनतेला की महिलांना घाबरवण्यासाठी. बघा आमच्याविरोधात काही बोलाल तर आमच्याकडे किती ताकद आहे ती.  गुन्हेगारांची हिंमत का वाढतेच याचा विचार व्हायला हवा. गेल्या दीड वर्षांत एक कवच तयार झालंय. मंत्री अडचणीत सापडला की यंत्रणा कामाला लागते, अशी टीका नीतेश राणेंनी केली. 

एखादं प्रकरण पद्धतशीरपणे कसं लपवायचं याचा ट्रेनिंग कॅम्प हे  सुरू करतील. म्हणजे उद्या काही त्रास नाही. गायकवाड ताईंना सांगितलं पाहिजे याचीही एक शाळा सुरू करा, असा टोलाही नीतेश राणे यांनी लगावला. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा