शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

'या' तीन कायद्यांच्या माध्यमातून मोदी शेतकऱ्यांचा गळा कापत आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 19:00 IST

या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल, असे राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi,Punjab )

नवी दिल्ली - संसदेच्या पवसाळी अधिवेशनात पास झालेल्या तीन कृषी कायद्यांसंदर्भात काँग्रेससह जवळपास सर्वच विरोधक केंद्रातील मोदी सरकारचा जोरदार विरोध करत आहेत. सध्या काँग्रेस पंजाबमध्ये 'ट्रॅक्टर यात्रा' काढत आहे. यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधीदेखील सहभागी होत आहेत. सोमवारी पंजाबमधील भवानीगड येथून समानापर्यंत ट्रॅक्टर यात्रा काढण्यात आली.

'आपली शेती वाचवा' यात्रेपूर्वी राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेली त्यांनी केंद्रावर जबरदस्त हल्ला चढवला. गांधी म्हणाले, "हे सरकार गेल्या सहा वर्षांपासून गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक आक्रमण करत आहे. यांची एकही नाही अशी नाही, की जिचा गरिबांना फायदा होईल."

राहुल गांधी म्हणाले, "नोटाबंदीनंतर जिएसटी कायदा आणला, आता तुम्ही कुण्याही एखाद्या छोट्या दुकानदाराला अथवा व्यापाऱ्याला विचारा, जीएसटीमुळे काय झाले. अद्यापही छोट्या दुकानदाराला अथवा व्यापाऱ्याला जीएसटी समजलेला नाही."

एवढी घाई कशाची होती?शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "मी तुम्हाला विचारू इच्छितो, हे कायदे या संकटाच्या काळातच का लागू केले गेले? एवढी घाई कशाची होती? कारण मोदीजींना माहीत आहे, की शेतकरी आणि मजुरांच्या पायावर कुऱ्हाड मारली, की ते घरातून बाहेर निघू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी केवळ ही व्यवस्था नष्ट करत आहेत. जेथे त्यांनी MSPची हमी द्यायला हवी, तेथे ते या तीन कायद्याच्या माध्यमाने शेतकरी आणि मजुरांना मारत आहेत. त्यांचा गळा कापत आहेत."

"या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल. हेच मोदींचे लक्ष्य आहे. येथे मी केवळ शेतकऱ्यांसाठीच उभा नाही, तर भारतातील सर्व जनतेसाठी उभा आहे. कारण केवळ शेतकरी आणि मजुरांचे नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.

आता काँग्रेस मागे हटणार नाही. मोदीजी आपल्याला शेतकऱ्यांची शक्ती ओळखावी लागेल. आता हे शेतकरी आणि मजूर कोरोनाला घाबरून घरात बसणार नाहीत, ते रस्त्यावर उतरतील आणि या कायद्यांचा विरोध करतील. यानंतर राहुल गांधींची ट्रॅक्टर यात्रा समाना येथे पोहोचली. मात्र, येथे अपेक्षेप्रमाणे लोक उपस्थित नव्हते. यावेळी राहुल गांधींच्या भाषणादरम्यान रिकाम्या खुर्च्याही दिसून आल्या. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPunjabपंजाबFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी