शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 22:55 IST

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं.

ठळक मुद्देबाहेर गावावरून येणाऱ्या कॅन्सर रुग्णाच्या नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी मी निर्णय घेतला होता. या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्दैवाची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना कुठेही अंधारात ठेऊन निर्णय घेण्यात आला नव्हताम्हाडा सदनिका टाटा रुग्णालयाता सुपूर्द करतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती.

मुंबई – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुद्द शरद पवारांच्या हस्ते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम घेतला होता. शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. मात्र आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तपासून अहवाल सादर करा, तोपर्यंत निर्णयाला स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारला आहे. या निर्णयाबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी जो निर्णय घेतला होता तो उदात्त भावनेतून घेतला होता. बाहेर गावावरून येणाऱ्या कॅन्सर रुग्णाच्या नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी मी निर्णय घेतला होता. त्यात माझा कुठलाही हेतू नव्हता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्दैवाची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना कुठेही अंधारात ठेऊन निर्णय घेण्यात आला नव्हता असंही त्यांनी म्हटलं आहे.

त्याचसोबत मुख्यमंत्री हे आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेतला जात नाही. म्हाडा सदनिका टाटा रुग्णालयाता सुपूर्द करतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती. मात्र यात काही गैरसमज झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ते टीव्ही ९ शी बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना कुठला संशय आहे का?

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडानं १०० सदनिका दिल्या, जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा त्याचं कौतुक केले होते. परंतु या निर्णयाला स्थगिती देण्यापूर्वी संवेदनशीलपणे विचार करायला हवा होता. निर्णय झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं का? या निर्णयाला स्थगिती देण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा होणं गरजेचे आहे. शिवसेना आमदाराचं पत्र वाचून या निर्णयामागे मुख्यमंत्र्यांना कुठे संशय आहे का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

आमदार अजय चौधरी यांच्यात पत्रात काय म्हटलंय?

शिवडी विधानसभा मतदारसंघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता सोसायटी या पुर्नरचित इमारतींमध्ये ७५० मराठी कुटुंब राहतात. सदर इमारती पुर्नविकसित करण्यात येत असल्याने म्हाडा प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या सदनिका रहिवाशी व संक्रमण शिबिरातील रहिवाशी यांना कायम स्वरुपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते. परंतु सदनिका त्यांना वितरीत न करता कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला. त्यामुळे या कुटुंबाने चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjay Chaudharyअजय चौधरीShiv SenaशिवसेनाPraveen Darekarप्रवीण दरेकर