शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Belgoan Election: “देवेंद्र फडणवीसांनी स्वत:ला महाराष्ट्रद्रोही असल्याचं सिद्ध केलं; त्यांच्याकडून अपेक्षाच नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 10:45 AM

लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढण्यासाठी भगवा झेंडा फडकवणं ही संधी निवडणुकीच्या माध्यमातून मराठी माणसाला मिळाली आहे असं शुभम शेळकेंनी सांगितले.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात सामील होणं हेच आमचं ध्येय आहे. कर्नाटकात मराठी माणसांची गळचेपी होते. ज्यावेळी महाराष्ट्रात फडणवीस सरकार होते तेव्हा आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साडे चार वर्ष लागली.शिवाजी महाराजांचा अपमान आणि भगव्या झेंड्याची विटंबना होते. त्यामुळे येथील सरकारविरोधात मराठी माणसांमध्ये चीड आहे.

बेळगाव – लोकसभेसाठी रिक्त झालेल्या जागेवर आज मतदान होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा लढा उभा राहिला. जे आमच्याविरोधात प्रचारासाठी बेळगावात आले त्यांनी स्वत:ला महाराष्ट्र्द्रोही असल्याचं सिद्ध केलं असा टोला महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना(BJP Devendra Fadnavis) लगावला आहे. शुभम शेळकेंनी मतदान करून बाहेर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शुभम शेळके(Subham Shelke) म्हणाले की, महाराष्ट्रात सामील होणं हेच आमचं ध्येय आहे. कर्नाटकात मराठी माणसांची गळचेपी होते. शिवाजी महाराजांचा अपमान आणि भगव्या झेंड्याची विटंबना होते. त्यामुळे येथील सरकारविरोधात मराठी माणसांमध्ये चीड आहे. लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढण्यासाठी भगवा झेंडा फडकवणं ही संधी निवडणुकीच्या माध्यमातून मराठी माणसाला मिळाली आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत बेळगाव प्रश्नाशी काँग्रेस आणि भाजपाला देणंघेणं नाही. हा प्रश्न काँग्रेसने उभा केला. ज्यावेळी महाराष्ट्रात फडणवीस सरकार होते तेव्हा आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साडे चार वर्ष लागली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. जोपर्यंत सीमावासियांचा प्रश्न सुटत नाही. त्यांच्यावरील अन्याय थांबत नाही तोपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती शर्थीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शुभम शेळके यांनी दिली.

शुभम शेळके स्पॉन्सर्ड उमेदवार

महाराष्ट्र एकीकरण समिती कधीही लोकसभेसाठी उमेदवार उभा करत नाही. सध्या त्यांच्या प्रचारात एकही जुने पदाधिकारी दिसत नाही. इथला मराठी माणूस भाजपाला मतदान करतो. ही मतं कमी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा स्पॉन्सर्ड उमेदवार उभा करण्याचं काम काही लोकांनी केले आहे असा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी केला होता.

काँग्रेसला जिंकवण्यासाठी शिवसेनेचा प्रचार

संजय राऊतांचा अजेंडा सध्या काँग्रेसला जिंकवणं एवढाच आहे. त्यासाठी बेळगावात प्रचाराला आले.  पोटनिवडणुकीत एक वरिष्ठ नेत्याचं निधन झालं आहे. त्यांची पत्नी याठिकाणी उभी आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाही हे माहिती आहे. त्यांनी कधी लोकसभा निवडणूक लढवली नाही. अलीकडच्या काळात शिवसेना काँग्रेस यांची जवळीक वाढली आहे. मुंबईत शिवसैनिक टीपू सुलतान जयंती साजरी करतात तर इथं काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते. त्यामुळे टीपू सुलतान जयंती साजरी करणाऱ्यांना जिंकवण्यासाठी संजय राऊत बेळगावात प्रचाराला आले होते असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला होता.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस