शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विंडीज बोर्डावर 250 कोटींचा दावा

By admin | Updated: November 2, 2014 00:59 IST

धर्मशाला येथे वन-डे सामना खेळल्यानंतर भारताचा दौरा तडकाफडकी सोडल्याबद्दल भारतीय क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर 250 कोटींचा नुकसानभरपाई दावा दाखल केला आहे.

ब्रिजटाऊन : धर्मशाला येथे वन-डे सामना खेळल्यानंतर भारताचा दौरा तडकाफडकी सोडल्याबद्दल भारतीय क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर 250 कोटींचा नुकसानभरपाई दावा दाखल केला आहे. बोर्डासोबत वेतन मुद्दय़ावर सुरू असलेल्या तंटय़ामुळे विंडीज खेळाडूंनी न खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे आधीच कंगाल झालेल्या विंडीज बोर्डाला बीसीसीआयने हा आणखी एक धक्का दिल्याने संकट कोसळू शकते.
बीसीसीआय सचिव संजय पटेल म्हणाले, की मी 25क् कोटी नुकसानभरपाई करण्याची मागणी असलेले पत्र विंडीज बोर्डाकडे पाठविले आहे. आम्ही दौरा सुरू ठेवण्यासाठी वारंवार आग्रह धरला; शिवाय मध्यस्थीची तयारीही दाखविली. तरीही दौ:यातून माघार घेतल्याने भारतीय क्रिकेटच्या नुकसानभरपाईचा दावा करणारे पत्र पाठवावे लागले. 
पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेपाठोपाठ विंडीजला भारताविरुद्ध एक टी-2क् सामना आणि हैदराबाद, बंगळुरू तसेच अहमदाबाद येथे कसोटी सामने खेळायचे होते.
बीसीसीआयने विंडीज बोर्डाला नुकसानभरपाई कशी करणार, याची ठोस योजना सादर करण्यासाठी दोन आठवडय़ांचा अवधी दिल्याचे विश्वसनीय सूत्रंनी सांगितले. असे न झाल्यास कॅरेबियन बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.
 
 
 
पटेल यांच्या स्वाक्षरीनिशी असलेल्या या पत्रत पुढे म्हटले आहे, की बीसीसीआयला जो आर्थिक फटका बसला, त्याची नुकसानभरपाई कशी करणार आणि त्यासाठी काय पावले उचलणार, हेदेखील स्पष्ट करावे. पत्र मिळाल्यापासून 15 दिवसांत अटी आणि शर्ती स्वीकारार्ह असल्याचा प्रस्ताव मिळाला नाही, तर बीसीसीआय भारतीय न्यायालयात आपल्या वकिलांमार्फत खटला दाखल करेल. ही पहिली नोटीस औपचारिक मागणी असल्याचे आपण मानू शकता. पटेल यांनी हे पत्र विंडीज क्रिकेट बोर्डाचे प्रमुख डेव्ह कॅमेरून यांना पाठविले आहे.(वृत्तसंस्था)
 
भारताची मनधरणी करावी : अॅण्डी रॉबर्ट्स
बीसीसीआयने 25क् कोटींचा नुकसानभरपाईचा दावा केल्यामुळे विंडीज बोर्डाचे अस्तित्व धोक्यात येणाची भीती व्यक्त करून हा दावा मागे घेण्यासाठी विंडीज अधिका:यांनी ताबडतोब भारतात दाखल होऊन समजूत काढायला हवी, असे मत विंडीजचे वेगवान गोलंदाज अॅण्डी रॉबर्ट्स यांनी व्यक्त केले.
बीसीसीआयने विंडीजसोबतचे क्रिकेट संबंध तोडलेच; शिवाय मोठय़ा रकमेची मागणी केली. यामुळे विंडीज क्रिकेट संपण्याची भीती आहे. यावर रॉबर्ट्स म्हणाले, ‘‘विंडीज बोर्ड आणि खेळाडूंमध्ये काय चालले आहे, हे पाहण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यापेक्षा विंडीजच्या अधिका:यांनी भारतात दाखल होऊन समजूत काढायला हवी. भारत-विंडीजदरम्यान पुढील आठ वर्षात पाच मालिकांचे आयोजन आहे. त्यात चार वेळा भारतीय संघ विंडीजचा दौरा करेल. भारताने हे दौरे न केल्यास आमच्या देशातील क्रिकेट रसातळाला जाईल.’’ दौरा अर्धवट सोडणा:या खेळाडूंच्या निर्णयाचा मी धिक्कार करतो; पण कुणाला दोषी धरण्याआधी सविस्तर माहिती मिळवावी लागेल, असे रॉबर्ट्स यांचे मत आहे. (वृत्तसंस्था)