शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रानमेवा बाजारात दाखल

By admin | Updated: March 17, 2017 05:50 IST

फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जंगलातील विविध फळेही बाजारात येत असतात. हा सर्व व्यवसाय मुरु ड तालुक्यासहित रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिला करीत असतात

अमुलकुमार जैन, बोर्ली-मांडलाफेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जंगलातील विविध फळेही बाजारात येत असतात. हा सर्व व्यवसाय मुरु ड तालुक्यासहित रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिला करीत असतात. या वर्षीही रानमेवा काजूगर, रांजणे, करवंदे, जांभळे, काजू बाजारात दाखल झाले आहेत. ओले काजूगर पाचशे रु पये किलो तर काजूचा वाटा शंभर रुपये असा विकला जात आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांत काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु खवय्ये यांच्या बाजारात ओल्या काजूगरांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. मुरुड तालुक्यात पर्यटन वाढल्याने ओले काजूगर व करवंदे यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे फायदा होत असल्याचे भारत जंगम यांनी सांगितले. ओले काजूगर काढणीचा व्यवसाय रायगड जिल्ह्यातील आदिवासी मंडळीच करीत असतात. त्यामध्ये हा व्यवसाय करण्यासाठी ओल्या काजू बिया काढणे, सोलून त्यातील गर काढणे या मुख्य प्रकिया असतात. यासाठी पुरुष आणि कुटुंबातील मुले ओल्या काजू बिया झाडावरून काढतात. ओले काजूगर काढण्याची अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची यंत्रणा अस्तित्वात नाही, असे सुभाष ठाकूर यांनी सांगितले आहे. आंबा, काजू बी, करवंदे यासारखी रानातील फळे दिवसभर गोळा करायची अन् दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी विकायची व येणाऱ्या पैशांवर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा, अशी परिस्थितीअसते. पावसाळ्यात शेतकऱ्यांकडे शेतीच्या कामाला तर कधी वीटभट्टीवर तर कधी मोलमजुरी तर कधी खाडीतील छोटी मासेमारी यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करीत असतात. एकंदरीत काय तर आदिवासी बांधवांचे जीवन कष्टमय आहे.