शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात २२ हजार गावांमध्ये पाणीटंचाई, प्रतिव्यक्ती ४० लिटरपेक्षाही कमी पाणी उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 07:27 IST

Water scarcity In Maharashtra News : प्रत्येक घरी पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचविण्यासाठी स्थापन झालेल्या जलशक्ती मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात जवळपास २० टक्के लोकसंख्येला रोज किमान ४० लिटर पाणी उपलब्ध नाही.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रात २२ हजारांपेक्षा जास्त ग्रामीण भागात राहणारे लोक पाणीटंचाईला तोंड देत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना असूनही या गावांत राहणाऱ्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किमान ४० लिटर पाणीदेखील रोजच्या रोज उपलब्ध होत नाही.प्रत्येक घरी पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचविण्यासाठी स्थापन झालेल्या जलशक्ती मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात जवळपास २० टक्के लोकसंख्येला रोज किमान ४० लिटर पाणी  उपलब्ध नाही. सरकारचा दावा मात्र जवळपास ७८ टक्के लोकसंख्येला दैनंदिन गरजांसाठी रोज ४० लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी उपलब्ध आहे. केंद्र सरकार वर्ष २०२४ पर्यंत सगळ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारांसोबत काम करीत आहे. यासाठी जल जीवन मिशन सुरू केले गेले आहे.मिशनअंतर्गत विषम प्राकृतिक परिस्थिती, मरुस्तलीय तथा प्रभावित भागांत पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ३० टक्के जास्त प्राधान्य दिले जात आहे. अधिकारी म्हणाला की, पाणीटंचाई कमी करण्यासाठी जल संरक्षणाच्या अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत.  

मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशभर तीन लाखांपेक्षा जास्त ग्रामीण वसाहतींत पाण्याची उपलब्धता रोज दर माणसी किमान ४० लिटरपेक्षाही कमी आहे. त्यात १८.२७ कोटी लोक राहतात. 

राजस्थानचे २.४१ कोटी लोकसंख्या असलेली ५६ हजार ३०२, पश्चिम बंगालची २.७४ कोटी लोकसंख्येची ३६ हजार ७११, कर्नाटकची १.७३ कोटी लोकसंख्येची ३३ हजार ३४५ खेडी व जवळपास १.८७ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रातील २२ हजार ९७ गावांचा समावेश आहे. 

पाणी वाचवण्यासाठी कमीत कमी पाण्यात शेतीसाठी नवे तंत्रज्ञान वापरले जात आहे. कृषी मंत्रालयावर ड्रॉप मोर क्रॉपच्या लक्ष्यासोबत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईMaharashtraमहाराष्ट्र