शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 07:39 IST

Air India : एकाच दिवसात एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही दुसरी घटना आहे.

एअर इंडिया या विमान कंपनीचे शुक्लकाष्ट संपतच नाहीये. रविवार, ३ ऑगस्ट रोजी भुवनेश्वरहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान 'एआय ५००' उड्डाणापूर्वी केबिनमधील वाढलेल्या तापमानामुळे रद्द करण्यात आले. एकाच दिवसात एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही दुसरी घटना आहे. नुकत्याच झालेल्या ऑडीटमध्ये विमान वाहतूक सुरक्षा नियामक डीजीसीएला टाटा समूहाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एअर इंडियामध्ये १०० हून अधिक उल्लंघने आढळली आहेत, ज्यात काही गंभीर सुरक्षा धोक्यांचा समावेश आहे. हा अहवाल समोर आला असतानाच ही घटना घडली आहे.

एअर इंडियाने रद्द झालेल्या या विशिष्ट विमानातील प्रवाशांची संख्या, विमानाचा प्रकार किंवा त्याची नियोजित प्रस्थान वेळ याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटच्या माहितीनुसार, हे विमान एअरबस ए३२१ प्रकारचे होते आणि दुपारी १२.३५ वाजता उड्डाण करून दिल्लीत दुपारी २.५५ वाजता पोहोचणार होते.

एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, "३ ऑगस्ट (रविवार) रोजी भुवनेश्वरहून दिल्लीला जाणारी फ्लाइट एआय ५०० ही तांत्रिक समस्येमुळे रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रस्थानापूर्वी केबिनचे तापमान खूप जास्त झाले होते. भुवनेश्वरमधील आमची विमानतळ टीम प्रभावित प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थान अर्थात दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यास मदत करत आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत."

या घटनेच्या काही काळापूर्वी, एअर इंडियाची सिंगापूरहून चेन्नईला जाणारी फ्लाइट एआय ३४९ देखील प्रस्थानापूर्वी देखभालीच्या कामामुळे रद्द करण्यात आली होती, ज्यासाठी अतिरिक्त वेळेची आवश्यकता होती.

DGCA च्या तपासात धोके उघडसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने केलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये गेल्या आठवड्यात एअर इंडियाच्या प्रशिक्षण, क्रू विश्रांती आणि कर्तव्य कालावधीचे नियम, हवाई क्षेत्र पात्रता इत्यादींशी संबंधित सुमारे १०० उल्लंघने आणि निरीक्षणे आढळून आली. यापैकी सात उल्लंघने लेव्हल-१ उल्लंघने अर्थात अधिक धोकादायक नियमांचे उल्लंघन असल्याचे समोर आले आहे.

विमान कंपन्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हगेल्या महिन्यात झालेल्या एका ऑनलाइन पॅन-इंडिया सर्वेक्षणात असे आढळून आले की, जवळजवळ ७६ टक्के प्रतिसादकर्त्यांचे मत होते की भारतातील अनेक विमान कंपन्या सुरक्षेपेक्षा प्रमोशनवर जास्त खर्च करत आहेत. लोकलसर्कलने केलेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, ६४ टक्के प्रतिसादकर्त्यांनी गेल्या तीन वर्षांत किमान एकदा तरी अशा उड्डाणाचा अनुभव घेतला आहे, ज्यामध्ये टेकऑफ, लँडिंग किंवा उड्डाणादरम्यान विमानांमध्ये बिघाड झाला होता. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाdelhiदिल्ली