शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

"कोकीळ अन् कावळा एकाच रंगाचे पण...", संस्कृत सुभाषितानं युक्तिवादाचा शेवट; कामत म्हणाले, खरी शिवसेना कोण ते...

By मोरेश्वर येरम | Updated: March 16, 2023 17:32 IST

सुप्रीम कोर्टात गेल्या ९ महिन्यांपासून सुरू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी अखेर आज पूर्ण झाली आहे.

नवी दिल्ली-

सुप्रीम कोर्टात गेल्या ९ महिन्यांपासून सुरू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी अखेर आज पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून खंडपीठानं निकाल राखून ठेवला आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या राजकीय महानाट्यात अखेर कुणाच्या बाजूनं निकाल लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दोन्ही पक्षकारांनी आपली बाजू खंडपीठासमोर मांडताना जोरदार आणि सडेतोड युक्तिवाद केला आहे. 

न्यायालयानं आज ठाकरे गटाच्या वकिलांना रिजॉइंडरसाठी वेळ दिला होता. यात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांना याआधीच्या युक्तिवादात राहून गेलेले मुद्दे मांडण्याची संधी मिळाली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्या युक्तिवादानं याचिकेची सुनावणी पूर्ण झाली. यावेळी कामत यांनी संस्कृत सुभाषिताचा दाखला देत आपला युक्तिवाद पूर्ण केला. 

'...तर शिवसेना पक्षाचं अस्तित्वच नष्ट होईल'; सरन्यायाधीशांनी सांगितली वस्तुस्थिती, ठाकरे गटाचे वकिलही स्तब्ध

"कोकीळ आणि कावळा हे दोघेही एकाच रंगाचे.. कधी कधी कावळा पण कोकीळ असल्याचं नाटक करतो. पण जेव्हा पहाट होते तेव्हा पितळ उघडं पडतं...कोकीळ गाते आणि कावळा काव काव करतो. इथे शिवसेना कोण? खरी शिवसेना कोण हे निकालाच्या वेळी स्पष्ट होईल", असं देवदत्त कामत म्हणाले आणि त्यांनी आपला युक्तिवाद संपल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. 

“शिंदे गटाला सरकार पाडायचं होतं पण आमदारकी घालवायची नव्हती”; कपिल सिब्बलांचे वर्मावर बोट

दोन्ही पक्षकारांना पुरेसा वेळ देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज सर्वांचं अभिनंदन केलं. तसंच कोर्टरुममधील ज्युनिअर सहकारांचंही अभिनंदन केलं आणि सुनावणी पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. कोर्टानं याप्रकरणाचा निकाल आता राखून ठेवला आहे. निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. 

"सारं स्पष्ट आहे...बाहेर थट्टा होतेय, लोकांचा आपल्यावर विश्वास उरला नाही", कोर्टात सिब्बल स्पष्टच बोलले!

देवदत्त कामत यांनी यावेळी एक महत्वाची गोष्ट खंडपीठाला लक्षात आणून दिली. पक्षात फूट पडल्याचा दावा आम्ही केलेला नाही असं वारंवार शिंदे गटाच्या वकिलांकडून म्हटलं जात आहे. पण निवडणूक आयोगानं दिलेला निकाल एकदा वाचा त्यांनी पक्षात फूट पडल्याचं स्पष्ट दिसून येत असल्याचा उल्लेख करत निकाल दिला आहे. शिवसेनेत फूट पडल्याचा पुरावा असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यांच्या लेखी निवेदनात फूट पडल्याचं नमूद आहे, असं कामत म्हणाले.

पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक, सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीचं महत्वपूर्ण विधान

राजकीय पक्ष ही काही अनिश्चित संकल्पना नाही. राजकीय पक्ष असल्याचा दावा करणारे अनेक गट असू शकतात. पण २१ जूनला एकच पक्ष होता ज्याचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत होते, असंही देवदत्त कामत म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय