शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

"कोकीळ अन् कावळा एकाच रंगाचे पण...", संस्कृत सुभाषितानं युक्तिवादाचा शेवट; कामत म्हणाले, खरी शिवसेना कोण ते...

By मोरेश्वर येरम | Published: March 16, 2023 5:30 PM

सुप्रीम कोर्टात गेल्या ९ महिन्यांपासून सुरू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी अखेर आज पूर्ण झाली आहे.

नवी दिल्ली-

सुप्रीम कोर्टात गेल्या ९ महिन्यांपासून सुरू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी अखेर आज पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून खंडपीठानं निकाल राखून ठेवला आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या राजकीय महानाट्यात अखेर कुणाच्या बाजूनं निकाल लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दोन्ही पक्षकारांनी आपली बाजू खंडपीठासमोर मांडताना जोरदार आणि सडेतोड युक्तिवाद केला आहे. 

न्यायालयानं आज ठाकरे गटाच्या वकिलांना रिजॉइंडरसाठी वेळ दिला होता. यात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांना याआधीच्या युक्तिवादात राहून गेलेले मुद्दे मांडण्याची संधी मिळाली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्या युक्तिवादानं याचिकेची सुनावणी पूर्ण झाली. यावेळी कामत यांनी संस्कृत सुभाषिताचा दाखला देत आपला युक्तिवाद पूर्ण केला. 

'...तर शिवसेना पक्षाचं अस्तित्वच नष्ट होईल'; सरन्यायाधीशांनी सांगितली वस्तुस्थिती, ठाकरे गटाचे वकिलही स्तब्ध

"कोकीळ आणि कावळा हे दोघेही एकाच रंगाचे.. कधी कधी कावळा पण कोकीळ असल्याचं नाटक करतो. पण जेव्हा पहाट होते तेव्हा पितळ उघडं पडतं...कोकीळ गाते आणि कावळा काव काव करतो. इथे शिवसेना कोण? खरी शिवसेना कोण हे निकालाच्या वेळी स्पष्ट होईल", असं देवदत्त कामत म्हणाले आणि त्यांनी आपला युक्तिवाद संपल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. 

“शिंदे गटाला सरकार पाडायचं होतं पण आमदारकी घालवायची नव्हती”; कपिल सिब्बलांचे वर्मावर बोट

दोन्ही पक्षकारांना पुरेसा वेळ देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज सर्वांचं अभिनंदन केलं. तसंच कोर्टरुममधील ज्युनिअर सहकारांचंही अभिनंदन केलं आणि सुनावणी पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. कोर्टानं याप्रकरणाचा निकाल आता राखून ठेवला आहे. निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. 

"सारं स्पष्ट आहे...बाहेर थट्टा होतेय, लोकांचा आपल्यावर विश्वास उरला नाही", कोर्टात सिब्बल स्पष्टच बोलले!

देवदत्त कामत यांनी यावेळी एक महत्वाची गोष्ट खंडपीठाला लक्षात आणून दिली. पक्षात फूट पडल्याचा दावा आम्ही केलेला नाही असं वारंवार शिंदे गटाच्या वकिलांकडून म्हटलं जात आहे. पण निवडणूक आयोगानं दिलेला निकाल एकदा वाचा त्यांनी पक्षात फूट पडल्याचं स्पष्ट दिसून येत असल्याचा उल्लेख करत निकाल दिला आहे. शिवसेनेत फूट पडल्याचा पुरावा असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यांच्या लेखी निवेदनात फूट पडल्याचं नमूद आहे, असं कामत म्हणाले.

पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक, सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीचं महत्वपूर्ण विधान

राजकीय पक्ष ही काही अनिश्चित संकल्पना नाही. राजकीय पक्ष असल्याचा दावा करणारे अनेक गट असू शकतात. पण २१ जूनला एकच पक्ष होता ज्याचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत होते, असंही देवदत्त कामत म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय