शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
5
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
6
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
7
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
8
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
9
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
10
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
11
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
12
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
14
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
15
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
16
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
17
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
18
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
19
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
20
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Daily Top 2Weekly Top 5

नियमित सेवांना स्पेशल दर्जा देऊन रेल्वेची वाढीव दराने वसुली; सुविधांमध्येही कपात

By देवेश फडके | Updated: January 12, 2021 16:51 IST

भारतीय रेल्वेकडून नियमित सेवा स्पेशल ट्रेन म्हणून चालवत आहे. यामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांकडून त्याच सेवांकरिता जादा रक्कम घेत आहे, अशी बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनियमित सेवांना भारतीय रेल्वेकडून स्पेशल दर्जास्पेशल दर्जामुळे तिकिटांच्या दरात वाढवाढीव तिकीट दरांमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली :भारतीय रेल्वेकडून नियमित सेवा स्पेशल ट्रेन म्हणून चालवत आहे. यामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांकडून त्याच सेवांकरिता जादा रक्कम घेत आहे, अशी बाब समोर आली आहे. नियमित सेवांना स्पेशल दर्जा दिल्याने रेल्वे प्रवाशांना अतिरिक्त भाडे द्यावे लागत असून, वाढीव दराचा भार प्रवाशांच्या खिशावर पडत आहे, असे सांगितले जात आहे. 

जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना मार्च २०२० मध्ये रेल्वेची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच कोरोनामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती. यानंतर जून २०२० मध्ये टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला प्रवाशांच्या सोयीसाठी २०० मार्गांवर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. मात्र, हळूहळू रेल्वे सेवा वाढवण्यात आल्या. विशेष म्हणजे यानंतर रेल्वेने नियमित सेवांना स्पेशल दर्जा देऊन चालवल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

देशात सण-उत्सवांचे वातावरण सुरू झाल्यानंतर फेस्टिव्हल सेवांनाही रेल्वेकडून मंजुरी देण्यात आली. मात्र, या सेवांचे भाडेही अन्य सेवांच्या तुलनेत अधिक आकारल्याचे समोर आले आहे. यातील काही सेवांचा कालावधी वाढवला आला आहे, असे समजते. 

एका रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक सेवांना स्पेशल दर्जा देण्यात आला आहे. स्पेशल सेवांचा तिकीट दर नेहमीच अधिक असतो. यामुळे रेल्वेला प्रतिवर्षी १९८००० कोटी रुपये मिळतात. यापैकी ३५ हजार कोटी रुपये प्रवासी आणि मालवाहतुकीतून मिळतात. मात्र, कोरोनामुळे रेल्वेची मिळकत कोट्यवधी रुपयांनी घसरली आणि यामुळेच स्पेशल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

याशिवाय काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा कोटा रद्द करण्यात आला आहे. तसेच मेमू, पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणेच युटीएस काऊंटर्स बंद करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर वेटिंग रुममध्ये थांबण्यासाठीही आता १० रुपये दर आकारण्याचा रेल्वे विचार करत असल्याचे समजते. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे