शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

एकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चार बहिणींचा बुडून मृत्यू; तलावात आंघोळ करताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 7:09 PM

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील तमलाव येथील रहिवासी पप्पू सिंह राजपूत यांच्या दोन मुली आशा आणि निशा तसेच त्यांचा भाऊ सुरेंद्र सिंह राजपूत यांच्या मुली चिंकी आणि निकी गावा बाहेरील तालावात आंघोळीसाठी गेल्या होत्या.

चित्तौडगड - राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यात रावतभाटा भागात शनिवारी एक मोठी घटना घडली. येथील तमलाव गावात तलावात आंघोळ करताना चार मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. या चौघीही तलावात आंघोळीसाठी गेल्या होत्या. या वेळी पाय घसरल्याने त्या तलावात बुडाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. (four sister drowned in Lake in Rajasthan)

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील तमलाव येथील रहिवासी पप्पू सिंह राजपूत यांच्या दोन मुली आशा आणि निशा तसेच त्यांचा भाऊ सुरेंद्र सिंह राजपूत यांच्या मुली चिंकी आणि निकी गावा बाहेरील तालावात आंघोळीसाठी गेल्या होत्या. तेथे एक मुलगी पाय घसरल्याने तलावात बुडू लागली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात इतर तीन बहिणीही  तालावात बुडाल्या. या मुली दुपारपर्यंतही घरी न परतल्याने कुटुंबीय तलावावर पोहोचले, तेव्हा, मुली तलावात बुडाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांत घटनेची माहिती देण्यात आली.

संपूर्ण गावावर शोककळा -माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी बोलावलेल्या लोकांनी दुपारच्या सुमारास या चारही मुलींचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. यानंतर, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रावतभाटा रुग्णालयात आणून, नंतर नातलगांना सोपविण्यात आले. या चारही मुलींचे वय दहा ते बारा वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावरच शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेPoliceपोलिसWaterपाणीRajasthanराजस्थान