'राहुल गांधींना मोठे होण्याची गरज...' हरदीप पुरी यांनी 'एपस्टीन फाइल्स'वर दिले प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:40 IST2026-02-12T15:16:35+5:302026-02-12T15:40:21+5:30
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत 'एपस्टीन फाइल्स' प्रकरणावर आपले नाव घेतल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेस नेत्याने मोठे होऊन हातवारे करण्याऐवजी विचारपूर्वक चर्चा करण्याची गरज आहे.

'राहुल गांधींना मोठे होण्याची गरज...' हरदीप पुरी यांनी 'एपस्टीन फाइल्स'वर दिले प्रत्युत्तर
अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित 'एपस्टीन फाईल्स'चा मुद्दा संसदेत उपस्थित केल्यावरून केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. "काँग्रेस नेत्याला आता मोठे होण्याची गरज आहे," अशा शब्दांत पुरी यांनी राहुल गांधींच्या राजकीय परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
'इंडिया टुडे'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हरदीप सिंह पुरी म्हणाले की, "राहुल गांधींनी लावलेल्या आरोपांबाबत मी स्वतः स्पष्टीकरण दिले होते. लाखो कागदपत्रांपैकी काही ईमेल्समध्ये माझे नाव आले आहे, हे मी आधीच सांगितले होते. जर राहुल गांधींनी ती सविस्तर नोट नीट वाचली असती, तर त्यांनी संसदेत स्वतःचे हसे करून घेतले नसते."
राहुल गांधींवर आयुष्यभर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी, सरकारने हक्कभंग प्रस्ताव आणणे टाळले
राहुल गांधींचा दृष्टिकोन म्हणजे 'हावभावाचे राजकारण' पुरी यांनी राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांच्यातील परिपक्वतेच्या अभावावर बोट ठेवले. ते म्हणाले, "हा मुद्दा केवळ एपस्टीनबद्दल नाही, तर विरोधी पक्षनेत्यांच्या अपरिपक्वतेबद्दल आहे. ते केवळ 'हावभावाच्या राजकारणावर' विश्वास ठेवतात. संसदेत एखादा मुद्दा मांडताना तुमचे संशोधन पक्के असायला हवे. राहुल गांधी काहीतरी बोलतात आणि नंतर चर्चा टाळून पळून जातात. संसद हे माहितीपूर्ण चर्चेचे व्यासपीठ आहे, केवळ प्रदर्शनाचे ठिकाण नाही."राहुल गांधींच्या दृष्टिकोनाला "हावभावाचे राजकारण" असे संबोधून हरदीप पुरी यांनी त्यांच्यावर आरोप केले आणि नंतर आवश्यक वादविवाद टाळल्याचा आरोप केला.
व्यापार करारावरील टीकेला चोख प्रत्युत्तर
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना पुरी म्हणाले की, "भारत प्रगती करत आहे याचा काँग्रेस नेत्यांना हेवा वाटतो, कारण त्यांचा जनतेच्या अपेक्षांवर विश्वासच नाही." यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या विधानाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींवरील आरोपांचा समाचार घेतला. "पंतप्रधानांवर शरणागतीचे आरोप करू शकेल असा कोणीही अजून जन्माला आलेला नाही," असेही पुरी म्हणाले.