शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पायऱ्यांवर आणि बागेत बसून हजारो विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 10:41 IST

बिहारमधील शिक्षण व्यवस्था कशी आहे याचे ज्वलंत उदाहरण बेतिया जिल्ह्यातील पदवी परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले आहे.

ठळक मुद्देबिहारमधील शिक्षण व्यवस्था कशी आहे याचे ज्वलंत उदाहरण बेतिया जिल्ह्यातील पदवी परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले आहे.बिहारच्या रामलखन महाविद्यालयात हा प्रकार घडला. रामलखन महाविद्यालयात पदवीच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना वर्गात बसायला जागाच मिळाली नव्हती.

पाटणा - बिहारमधील शिक्षण व्यवस्था कशी आहे याचे ज्वलंत उदाहरण बेतिया जिल्ह्यातील पदवी परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले आहे. काही विद्यार्थी पायऱ्यांवर बसून उत्तरपत्रिका लिहीत आहेत तर काही जण महाविद्यालयाच्या बागेत एकमेकांशेजारी बसून उत्तरपत्रिका सोडवत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या रामलखन महाविद्यालयात हा प्रकार घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, रामलखन महाविद्यालयात पदवीच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना वर्गात बसायला जागाच मिळाली नव्हती. त्यामुळे आपल्या परीक्षा केंद्रात, महाविद्यालयात विद्यार्थी पोहोचले तेव्हा त्यांना जिथे जागा मिळेल तिथे बसून उत्तरपत्रिका लिहा असे सांगण्यात आले होते. महाविद्यालयाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना येथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने हा सर्व गोंधळ झाल्याचं अधीक्षकांनी सांगितलं आहे. 

रामलखन महाविद्यालयाची परीक्षा केंद्रासाठीची क्षमता ही अडीच हजार विद्यार्थी बसतील इतकीच आहे. पण येथे सहा हजार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पाठवण्यात आले होते. त्यामुळे जिथे बसायला जागा मिळेल तिथूनच उत्तरपत्रिका लिहिण्याखेरीज विद्यार्थ्यांना पर्याय नव्हता असा खुलासा महाविद्यालयातर्फे करण्यात आला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी कर्नाटकात देखील असाच एक अजब प्रकार समोर आला होता. पूर्वविद्यापीठ परीक्षेदरम्यान जवळपास 50 विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कार्डबॉक्स ठेऊन परीक्षा द्यावी लागली. हावेरी जिल्ह्यात ही घटना घडली होती. 

हावेरी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांनी डीडीपीआयला या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितलं होतं. कॉपी रोखण्यासाठी हा प्रकार केल्याचं बोललं जातं. कॉलेजमध्ये परीक्षा देणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली होती. हे विद्यार्थी अर्थशास्त्र आणि रसायन विज्ञानाचा पेपर देत होते. तसेच या कार्डबॉक्सला मुलांना लिहिण्यासाठी दिसावं आणि श्वास घेता यावं एवढं कापण्यात आलं होतं. या कार्डबॉक्समुळे विद्यार्थ्यांना आजूबाजूला बघता येणं शक्य नव्हतं. मात्र अशाप्रकारे विद्यार्थ्यांसोबत प्रकार घडल्याने राज्यात विरोधकांनी आवाज उठविला. मुलांसोबत केलं जाणारं कृत्य अयोग्य आहे याबाबत योग्य ती कारवाई करू असं आश्वासन शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिलं होतं.

 

टॅग्स :BiharबिहारStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयexamपरीक्षा