शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

पायलट पॉझिटिव्ह; रशियाला निघालेले विमान पुन्हा दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 4:46 AM

अर्ध्या रस्त्यातून माघारी । मॉस्कोसाठी एअर इंडियाचे दुसरे विमान रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रशियात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या मॉस्कोकडे रवाना झालेल्या रिकाम्या विमानाच्या दोन वैमानिकांपैकी एक वैमानिक कोरोराग्रस्त असल्याचे लक्षात आल्याने हे विमान अर्ध्या रस्त्यातून माघारी वळवून शनिवारी दुपारी पुन्हा दिल्लीला परत आणण्यात आले.

सूत्रांनी सांगितले की, एअर इंडियाचे एअरबस ए-३२० निओ हे विमान शनिवारी सकाळी फक्त विमान कर्मचाऱ्यांना घेऊन दिल्लीहून मॉस्कोकडे रवाना झाले. त्यानंतर विमानाच्या दोन वैमानिकांपैकी एकाचा कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला असूनही त्याला विमान घेऊन पाठविले गेल्याचे लक्षात आले. तोपर्यंत सुमारे दोन तास प्रवास करून हे विमान उझबेगिस्तानच्या हवाईहद्दीत पोहोचले होते. लगेच वैमानिकांना विमान माघारी वळविण्याचा संदेश पाठविण्यात आला. हे विमान दुपारी १२.३० च्या सुमारास दिल्लीला परत आले.या विमानातील वैमानिकांसह सर्व कर्मचाऱ्यांना लगेच क्वारंटाईनमध्ये पाठवून विमानाचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

तातडीने दुसरे तशाच प्रकारचे विमान तयार करून ते सायंकाळी पुन्हा मॉस्कोकडे रवाना करण्यात आले. सध्या एअर इंडिया ‘वंदे भारत’ मोहिमेंतर्गत परदेशांत अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी अनेक देशांमध्ये विशेष विमाने पाठवत आहे. या विमानांमधील सर्व कर्मचारी व वैमानिकांची कोरोना चाचणी करून ती ‘निगेटिव्ह’ असेल, तरच त्यांना नेमण्याचे सक्त आदेश भारत सरकारने दिले आहेत. त्यानुसार विशेष विमानांसाठी ड्यूटीवर पाठवायच्या कर्मचाºयांच्या चाचण्या करण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज अशा चाचण्यांचे सुमारे ३०० अहवाल येत असतात. ते पाहून ज्यांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ नाहीत, अशांनाच या विशेष विमानांवर नेमले जाते. चाचणी अहवाल पाहणाºया कर्मचाºयाने नजरचुकीने या वैमानिकाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ऐवजी ‘निगेटिव्ह’ असा वाचला व त्यामुळे या वैमानिकास मॉस्कोला जाणाºया विमानासाठी नेमले गेले. कामाच्या व्यापामुळे ही चूक झाली; पण ती दडपून न टाकता प्रामाणिकपणे कबूल करून लगेच सुधारली गेली, हे लक्षात घ्यायला हवे. कर्मचाºयांना त्यांच्या पगाराच्या सुमारे ७० टक्के रक्कम ‘फ्लाईट अलाऊन्स’ म्हणून मिळते. गेले तीन महिने ही रक्कम मिळालेली नाही.टोळधाडीचा विमानांनाही धोका;सावधानतेचा डीजीसीएचा इशारानवी दिल्ली : देशाच्या अनेक भागांत टोळधाडीचा धुमाकूळ सुरू असल्याने विमानाचे लँडिंग आणि टेकआॅफ करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन नागरी उड्डयन महासंचालनालयाने केले आहे.डीजीसीएने याबाबत दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की, साधारणत: टोळ जमिनीपासून खालच्या स्तरावर दिसून येतात. यामुळे विमानाचे टेकआॅफ व लँडिंग करताना धोका निर्माण होऊ शकतो. हे टोळ झुंडीने फिरत असल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. उड्डाणाच्या दरम्यान पायलटने याकडे लक्ष द्यावे. यामुळे वायपर आणि वाइंड शिल्डचा उपयोग करण्याची स्थिती आणखी खराब होऊ शकते.डीजीसीएने एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स यांना सांगितले आहे की, याबाबत माहिती मिळताच पायलटस्ना सावधान करण्यास सांगितले आहे. अर्थात, या टोळधाडी रात्रीच्या वेळेस उडत नाहीत. या टोळधाडी पाकिस्तानातून भारतात आल्या आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान आणि देशाच्या अन्य भागात या धाडी जात आहेत.100-150 कि.मी.चा प्रवास हे टोळ एका दिवसात करतात. या टोळधाडी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या