शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांचे खासदार लोकसभेच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होते; PM मोदींनी दिला पाण्याचा ग्लास, बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 01:28 IST

पंतप्रधानांनी सर्वप्रथम काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. मात्र त्यांनी तो घेतला नाही. यानंतर त्यांनी हिबी ईडन यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. त्यांनी तो घेऊन पिऊन टाकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेला संबोधित केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. पंतप्रधानांचे भाषण दोन तासांहूनही अधिक वेळ चालले. यावेळी सभागृहात विरोधी पक्षाचे नेते जोरदार घोषणाबाजी करत होते. काही नेत्यांनी तर वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी वेलमध्ये घोषणाबाजी करणाऱ्या खासदाराला पीएम मोदींनी पाण्याचा ग्लास दिला. पंतप्रधानांनी सर्वप्रथम काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. मात्र त्यांनी तो घेतला नाही. यानंतर त्यांनी हिबी ईडन यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. त्यांनी तो घेऊन पिऊन टाकला.

नेमकं काय घडलं? -
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भाषण करत असताना, विरोधकांनी गदारोळ सुरू केला. तेव्हा पंतप्रधानांनी हेडफोन लावला. दरम्यान त्यांनी पाणी पिले आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनाही विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

हिबी ईडन हे केरळमधील एर्नाकुलमचे काँग्रेसचे खासदार आहेत. या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत ते लोकसभेत पोहोचले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हिबी ईडन यांनी एर्नाकुलम येथे सीपीआय (एम) च्या पी. राजीव यांचा 1.6 लाखहून अधिक मतांनी पराभव केला होता.

काँग्रेसवर हल्लाबोल -
यावेळी, काँग्रेस आता परजीवी झाली आहे, असे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत. ते म्हणाले, "काँग्रेसच्या सहकारी पक्षांनी लोकसभा निवडणूक निकालांचे व्यवस्थित विश्लेषण केले नाही, असे वाटते. 2024 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस परजीवी झाली आहे. ही आता परजीवी काँग्रेस आहे. परजीवीसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, परजीवी ज्याच्यासोबत असते, त्यालाच खाऊन टाकते.   

देशाने 1 जुलैला खटाखट दिवस साजरा केला -
मोदी म्हणाले, "देशाने 1 जुलै रोजी खटाखट दिवस साजरा केला. 1 जुलै रोजी लोक आपल्या बँक खात्यात 8,500 रुपये आले की नाही? हे बघण्यासाठी गेले होते. या खोट्या नॅरेटिव्हचा परिणाम बघा, याच निवडणुकीत काँग्रेसने देशवासीयांची दिशाभूल केली. माता-भगिनींना दरमहा साडेआठ हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन, या माता-भगिनींवर जो आघात झाला आहे ना, तो श्राप बनून काँग्रेसला बरबाद करणार आहे.

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर खोटेपणाचा आरोप -
मोदी पुढे म्हणाले, "ईव्हीएमसंदर्भात खोटं बोलणे, संविधानासंदर्भात खोटं बोलणे, आरक्षणासंदर्भात खोटं बोलणे, यापूर्वी राफेलसंदर्भात खोटं बोलणे, एचएएलसंदर्भात खोटं बोलणे, बँकांसंदर्भात खोटं बोलणे, कर्मचाऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्नही झाला." एवढेच नाही तर, "हिम्मत एवढी वाढली की, काल सभागृहाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. अग्निवीरसंदर्भात सभागृहात खोटे बोलले गेले. काल येथे प्रचंड खोटे बोलले गेले," असेही मोदी म्हणाले.

 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदcongressकाँग्रेसWaterपाणीlok sabhaलोकसभा