शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 21:22 IST

PM Modi On Operation Sindoor: पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. दहशतवाद आणि चर्चा असे अजिबात चालणार नाही, अशा शब्दात मोदींनी ठणकावून सांगितले.  

PM Modi Operataion Sindoor Latest News: "हे युग युद्धाचे नाहीये, पण हे युग दहशतवादाचेही नाहीये. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स ही चांगलं विश्वाची ग्यॅरंटी आहे. पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानचे सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. हाच दहशतवाद एक दिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेन", असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राष्ट्राला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत दहशवाद्यांना अशाच पद्धतीने उत्तर भविष्यातही दिले जाईल. दहशतवादी आणि त्यांना थारा देणाऱ्या पाकिस्तान सरकारला एकाच नजरेनं बघितलं जाईल, स्पष्ट मेसेज पंतप्रधान मोदींनी दिला. 

पाकिस्तानला वाचायचं असेल, तर...

पंतप्रधान मोदी म्हणाले, "पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर त्याला दहशतवादी अड्ड्यांची सफाई करावीच लागेल. त्याशिवाय शांती प्रस्थापित होण्याचा कोणताही मार्ग नाहीये."

वाचा >>"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

"भारताचे मत एकदम स्पष्ट आहे की, दहशतवाद आणि संवाद एकत्रितपणे होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्रितपणे चालू शकत नाही. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही. मी आज जगालाही सांगू इच्छितो की, आमचे धोरण राहिले आहे की, पाकिस्तानसोबत जर चर्चा होईल, तर ती दहशतवादावरच होईल", अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदींनी मांडली. 

आता पाकव्याप्त काश्मीरच चर्चा होईल

"पाकिस्तानसोबत चर्चा होईल, ती पाकव्याप्त काश्मीरवरच होईल. आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे. शांततेचा मार्ग सुद्धा शक्तीने होतो. भारताचं शक्तिशाली होणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यावर त्या शक्तीचा वापर करणेही आवश्यक आहे. मागील काही दिवसांत भारताने तेच केले आहे", असे मोदी देशवासीयांशी बोलताना म्हणाले.

कुंकू पुसरण्याचा परिणाम दहशतवाद्यांना कळला

मोदी म्हणाले, "या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, समाज, प्रत्येक राजकीय पक्ष एका सूरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी उभे राहिला. आम्ही दहशततवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारताच्या सैन्याला स्वातंत्र्य दिले. आणि आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक दहशतवादी संघटनेला कळलं आहे की, आपल्या माता-भगिनी आणि मुलींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो."

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानTerrorismदहशतवादIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक