शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

"भाजप लोकांना मासे, मांस आणि अंडी..."; पश्चिम बंगालच्या प्रचारसभेतून ममता बॅनर्जी यांचा जोरदार हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:37 IST

"भाजपला लोकांच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण मिळवायचे असून, ते लोकांना मासे, मांस आणि अंडी खाण्यापासून रोखू इच्छित आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपचा कोणत्याही धर्मावर विश्वास नसल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.


पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुरुलिया येथील जाहीर सभेत भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. "भाजपला लोकांच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण मिळवायचे असून, ते लोकांना मासे, मांस आणि अंडी खाण्यापासून रोखू इच्छित आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपचा कोणत्याही धर्मावर विश्वास नसल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

भाजपशासित राज्यांमधील परिस्थितीवर बोट ठेवताना ममता म्हणाल्या, "त्या राज्यांमध्ये दंगली होतात, आदिवासींचे शोषण केले जाते आणि महिलांवर हल्ले होतात. भाजपच्या एका मोठ्या नेत्याने तृणमूल काँग्रेसविरोधात आरोपपत्र प्रसिद्ध केल्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, "खरी चार्जशीट तर भाजपविरोधात असायला हवी." यावेळी त्यांनी गुजरातमध्ये झालेल्या दंगलींचा उल्लेख करून भाजपच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल २०२६ रोजी पार पडेल. तर निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे. यावेळच्या निवडणुकीत सुमारे ७ कोटी मतदार आपला हक्क बजावणार असून, त्यात ३.६ कोटी पुरुष आणि ३.४ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय, १४०२ ट्रान्सजेंडर मतदारही आहेत. २०२१ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २१५ जागा जिंकून निर्भेळ यश मिळवले होते, तर भाजपला ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून बंगालचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

विशेष म्हणजे, यावेळची निवडणूक अनेक कारणांनी महत्त्वाची ठरत आहे. मतदार यादीच्या पुनरीक्षणानंतर (SIR) सुमारे ६३ लाख ६६ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून, ६० लाखांहून अधिक नावे अद्याप चौकशीच्या फेऱ्यात आहेत. 


 

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee attacks BJP over food choices in Bengal rally.

Web Summary : Mamata Banerjee accused BJP of controlling food habits, specifically targeting consumption of fish, meat, and eggs in West Bengal. She criticized BJP's governance, citing riots and exploitation in BJP-ruled states, ahead of upcoming elections.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६