शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ICMR Chief epidemiologist on Coronavirus : नव्या स्ट्रेनमुळे घाबरण्याचं कारण नाही, आणखी म्युटेशन येत राहणार - आयसीएमआर तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 09:24 IST

Conavirus ICMR Chief epidemiologist : या प्रकारचे अनेक व्हेरिअंट येत राहणार, त्यामुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं ICMR चे चीफ एपिडेमोलॉजिस्ट डॉक्टर समीरन पांडा यांची माहिती.

ICMR Chief epidemiologist on Coronavirus : कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनमुळे (omicron variant) सध्या देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही देशांनी नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, डॉ. समीरन पांडा यांनी सतर्क राहणं आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

"जगात कोणत्याही प्रकारची महासाथ येते तेव्हा विशेषकरून विषाणू हहा त्याचं स्वरूप बदलत असतो. कोरोना विषाणूच्या बाबतीतही अगदी तिच स्थिती आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये याचे आणखीही म्युटेंट समोर येतील. यामुळेच आपल्याला घाबरण्याचं कारण नाही, आपल्याला यापासून बचाव करायचा आहे," असं पांडा म्हणाले. अमर उजालाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर वक्तव्य केलं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सर्वात चांगला आणि उत्तम उपाय म्हणजे त्यासाठी ज्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात, त्याचं पालन करणं हाच आहे. लसीकरण, मास्कचा वापर, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, हात धुणं, सॅनिटायझरचा वापर अशा गोष्टींचा वापर केला पाहिजे. जर अशा गोष्टींचा दिनचर्येत वापर केला तर केवळ कोरोना विषाणूच नाही, तर अन्य गोष्टींपासूनही बचाव होईल. कोणत्याही गोष्टींना घाबरण्यापेक्षा त्याच्यापासून बचावासाठी असलेल्या उपायांचा वापरच उत्तम ठरणार असल्याचं ते म्हणाले.

सतर्क राहण्याची गरज"जगातील निरनिराळ्या देशांमध्ये कोरोना विषाणूचं बदलतं रुप समोर येत आहे. विशेषकरून ज्यांचा प्रसार अचानक तेजीनं होतो किंवा जे अधिक गंभीर आहेत. त्याच्यापासून निश्चितच आपल्याला अलर्ट राहायला हवं, त्या दिशेनं केंद्रानं अॅडव्हायझरीच्या रुपात पाऊल उचललं आहे. आपल्याला या प्रकरणी अलर्ट राहण्याची गरज आहे," असं डॉ. पांडा म्हणाले. राज्यांमध्ये ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि सँपलिंग सातत्यानं करत राहावं, यासंदर्भात राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे आपण योग्य दिशेनं न केवळ प्रकरणांची तपासणी करू शकतो, तर यामुळे आपल्या संसर्गही रोखता येईल. परंतु सध्या महासाथ वाढण्याच्या दृष्टीनं आपल्या देशात कोणतेही संकेत मिळाले नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत