शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

... "तेव्हा मी मुंडन करुन अयोध्येतून पळाले होते"; उमा भारतींनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 7:14 PM

२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीतील प्राणप्रतिष्ठा सोहहळ्याची चर्चा आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी हा भव्य-दिव्य सोहळा होत असून देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. यानिमित्ताने रामजन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतलेल्या, रामजन्मभूमीत आंदोलनासाठी अयोध्येत जाऊन कारसेवा केलेल्या बहुतांश कारसेवकांना अयोध्येचं निमंत्रण दिलं जात आहे. अयोध्येतील या कारसेवेत मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनीही योगदान दिलं होतं. त्याच, अनुषंगाने त्यांनी कारसेवेतील काही आठवणी जागवल्या आहेत. 

२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात, रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी असलेल्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपा नेत्या उमा भारती यांचाही आंदोलनात सक्रीय सहभाग होता. विशेष म्हणजे या आंदोलनातील सहभागावेळी आपण शहीद होतो की काय, असे प्रसंगही तीनवेळा घडल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

मला रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र येथून फोन आला होता, तुम्ही २२ ऐवजी १८ जानेवारीलाच अयोध्येला या. त्यामुळे, मी अयोध्येत १८ जानेवारीपासूनच असणार आहे. मी १२ वर्षांची असल्यापासून या दिवसाची वाट पाहात होते. रामचंद्रास परमहंस यांनी मला ही जागा दाखवली होती. तेव्हा, बंद कुलूपात रामलला होते, केवळ पुजेसाठी ते कुलूप उघडले जात. हिंदू समाजाचा हा केवढा अपमान आहे, अशी भावना त्यावेळी माझ्या मनी होती. 

तेव्हापासूनच मी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले आहे. पहिल्यांदा जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा आम्ही बांधाच्या तुरुंगात होतो. आमच्यासोबत मिश्रा, वसुंधरा आणि मेहता हेही होते. एका गेस्ट हाऊसला तुरुंगाचा दर्जा देऊन आम्हाला तेथे ठेवले होते. मात्र, मी डोक्याचं मुंडन करुन, वेश बदलून तेथून पळून गेले होते, अशी आठवण आणि रामजन्मभूमी आंदोलनातील आपला सहभाग उमा भारती यांनी स्पष्ट केला. 

२ नोव्हेंबर रोजीची कारसेवा सर्वात विशेष मानली जाते. त्यावेळी, एका समुहाचं नेतृत्त्व मला दिले होते, आमच्या सर्वांवर भीषण लाठीचार्ज झाला होता, गोळीबारही करण्यात आला होता. ज्यामध्ये, प्रा. अरोडा आणि राम व शरद कोठारी यांचा मृत्यू झाला होता. या कारसेवेत मोठा हिंसाचार झाला होता. एक धाडसाचं आणि शालिनतेचं प्रदर्शन होतं. त्यानंतर, ६ डिसेंबर रोजीची कारसेवा घडली. त्या आंदोलनातही मी सहभागी होते, अशी आठवण सांगताना ६ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेचा वृत्तांतही उमा भारती यांनी सांगितला. तसेच, यावेळी मी या आंदोलनात मृत्यूमुखी पडते, किंवा शहीद होते की काय, असेही वाटल्याचं त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपा