शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:07 IST

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

Asaduddin Qwaisi: बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरुन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमधील मतदार यादीतील घोळ आणि पहलगाम हल्ल्यवरुन केंद्रावर जोरदार निशाणा साधला. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे आणि 'ऑपरेशन सिंदूर' चालू ठेवले पाहिजे असंही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला होता. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहार निवडणुकीशी याचा संबंध जोडत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या हल्ल्याला गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हटले. बांगलादेशी-रोहिंग्या बिहारमध्ये असल्याचे आपल्याला कळतं, पण दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले हे आम्हाला माहित नाही, असं म्हणत ओवैसींनी टीका केली. तेलंगणाच्या निजामाबादमध्ये एका सभेत ओवैसी बोलत होते.

"जर तुम्हाला या देशावर प्रेम असेल तर मला भाजपवाल्यांनो सांगा की हे सत्य नाही का भारताला खरा धोका पाकिस्तानपासून आहे, भारताला धोका चीनपासून आहे. चीन आणि पाकिस्तान बांगलादेशात घुसले आहेत. देशाला ज्यांच्याकडून धोका आहे त्यांच्याकडे लक्ष द्या, तुम्ही देशात काय करत आहात? चीन भारताला सर्व बाजूंनी वेढत आहे. बांगलादेश सीमेवर, चीन बांगलादेशच्या लोकांसाठी एक हवाई पट्टी बांधत आहे. भारतातून उभे राहून पाहू शकता. भारताचा शत्रू आपल्या दारावरआहे आणि आता भारतात कोणीतरी म्हणत आहे, हे करू नका, ते करू नका, घर पाडा, बुलडोझर चालवा, मशीद उखडून टाका, हे काय सुरु आहे?," असा सवाल असदुद्दीन ओवैसींनी केला.

"पहलगाममध्ये आपल्या २६ हिंदू बांधवांना चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मारले आणि तिथले राज्यपाल आता जुलै महिन्यात म्हणत आहेत की मी जबाबदार आहे. जर तुम्ही जबाबदार असाल तर पद सोडून द्या आणि निघून जा. दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले? तुम्ही म्हणता की बिहारमध्ये बांगलादेशी, रोहिंग्या आहेत, तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे. मग ते चार दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले हे मला सांगा, तुम्ही झोपला होता का? तुमचे प्रशासन डोळे मिटून बसले होते. जेव्हा तुम्ही मतदार यादीच्या नावाखाली बांगलादेशी रोहिंग्या आहेत म्हणता, तेव्हा पहलगामचा बदला घ्यावा लागेल आणि ऑपरेशन सिंदूर चालू ठेवावे लागेल. जोपर्यंत ते चार दहशतवादी पकडले जात नाही, जोपर्यंत ते मारले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाब विचारत राहू," असंही ओवैसी म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी