शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:07 IST

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

Asaduddin Qwaisi: बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरुन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमधील मतदार यादीतील घोळ आणि पहलगाम हल्ल्यवरुन केंद्रावर जोरदार निशाणा साधला. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे आणि 'ऑपरेशन सिंदूर' चालू ठेवले पाहिजे असंही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला होता. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहार निवडणुकीशी याचा संबंध जोडत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या हल्ल्याला गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हटले. बांगलादेशी-रोहिंग्या बिहारमध्ये असल्याचे आपल्याला कळतं, पण दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले हे आम्हाला माहित नाही, असं म्हणत ओवैसींनी टीका केली. तेलंगणाच्या निजामाबादमध्ये एका सभेत ओवैसी बोलत होते.

"जर तुम्हाला या देशावर प्रेम असेल तर मला भाजपवाल्यांनो सांगा की हे सत्य नाही का भारताला खरा धोका पाकिस्तानपासून आहे, भारताला धोका चीनपासून आहे. चीन आणि पाकिस्तान बांगलादेशात घुसले आहेत. देशाला ज्यांच्याकडून धोका आहे त्यांच्याकडे लक्ष द्या, तुम्ही देशात काय करत आहात? चीन भारताला सर्व बाजूंनी वेढत आहे. बांगलादेश सीमेवर, चीन बांगलादेशच्या लोकांसाठी एक हवाई पट्टी बांधत आहे. भारतातून उभे राहून पाहू शकता. भारताचा शत्रू आपल्या दारावरआहे आणि आता भारतात कोणीतरी म्हणत आहे, हे करू नका, ते करू नका, घर पाडा, बुलडोझर चालवा, मशीद उखडून टाका, हे काय सुरु आहे?," असा सवाल असदुद्दीन ओवैसींनी केला.

"पहलगाममध्ये आपल्या २६ हिंदू बांधवांना चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मारले आणि तिथले राज्यपाल आता जुलै महिन्यात म्हणत आहेत की मी जबाबदार आहे. जर तुम्ही जबाबदार असाल तर पद सोडून द्या आणि निघून जा. दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले? तुम्ही म्हणता की बिहारमध्ये बांगलादेशी, रोहिंग्या आहेत, तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे. मग ते चार दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले हे मला सांगा, तुम्ही झोपला होता का? तुमचे प्रशासन डोळे मिटून बसले होते. जेव्हा तुम्ही मतदार यादीच्या नावाखाली बांगलादेशी रोहिंग्या आहेत म्हणता, तेव्हा पहलगामचा बदला घ्यावा लागेल आणि ऑपरेशन सिंदूर चालू ठेवावे लागेल. जोपर्यंत ते चार दहशतवादी पकडले जात नाही, जोपर्यंत ते मारले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाब विचारत राहू," असंही ओवैसी म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी