शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील शेतक-यांना माल कुठेही विकण्याची मुभा

By admin | Updated: December 14, 2014 13:55 IST

कायदा 1963 नुसार कुठेही उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य असल्याची कबुली कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.

राज्यसभा : कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया यांचे विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतक-यांना कृषी उत्पादन विपणन (विकास आणि नियमन) कायदा 1963 नुसार कुठेही उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य असल्याची कबुली कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.
महाराष्ट्रात 304 कृषी उत्पन्न बाजार समित्या असून त्यापैकी 103 बाजार समित्या विदर्भात आहेत. बाजाराच्या चांगल्या सुविधांच्या अभावी शेतक:यांना आपला शेतमाल विकण्यासाठी स्थानिक व्यापारी आणि दलालांवर निर्भर राहावे लागते. हे व्यापारी अगदीच कमी किमतीत माल विकत घेतात याची सरकारला माहिती आहे काय?  विदर्भातील बहुतांश शेतकरी आपले पीक ज्यांच्याकडून कर्ज घेतले अशा सावकारांना विकतात. हे सत्य असेल तर सरकारने विदर्भ आणि महाराष्ट्रातील अन्य भागातील शेतक:यांना या फे:यातून मुक्त करण्यासाठी कोणत्या सुविधा पुरविल्या ते सांगावे, असा प्रश्न खा. विजय दर्डा यांनी विचारला होता. लेखी उत्तरात कुंदरिया म्हणाले की, विदर्भात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत(आरकेव्हीआय) कृषी उत्पन्न बाजार समित्यासंबंधी आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी प्रतिस्पर्धा प्रकल्प, आशियाई विकास बँक व सीएआयएम योजनेंतर्गत आराखडा तयार केला जात आहे. शेतक:यांनी हतबल होत माल विकू नये यासाठी सरकारने अनेक सुविधा पुरविल्या आहेत. कर्ज व्यवस्थापनांतर्गत शेतक:यांना बँका आणि बाजार समित्यांद्वारे कर्ज  कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करवून दिले जात आहे.
 
रेल्वेत महिला व मुलांच्या छळवणुकीच्या घटना वाढल्याची सरकारची कबुली
 - धावत्या रेल्वेत महिला आणि मुलांच्या छळवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची कबुली रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली. 
- गेल्यावर्षी रेल्वेमध्ये महिला आणि मुलांच्या छळवणुकीच्या एकूण 242 घटनांची नोंद झाली. यावर्षी ऑक्टोबर्पयतच त्यापेक्षा जास्त 245 घटना नोंदविल्या गेल्या.
- याबाबत दर्डा, प्रमोद तिवारी आणि के. सी. त्यागी यांनी संयुक्त प्रश्न विचारला होता. रेल्वेमध्ये लूटमार, चोरी, खून, मुले आणि महिलांचा छळ करण्याच्या घटनांचा तपशील पाहता सरकारने प्रवाशांच्या विशेषत: महिला आणि मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणती यंत्रणा विकसित केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न या तिघांनी एका प्रश्नाद्वारे केला होता. 
- त्यावर सिन्हा म्हणाले की, महानगरांमध्ये सर्व लेडीज स्पेशल गाडय़ांमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी असतात.
-  लोकल गाडय़ांमध्ये महिलांच्या डब्यांमध्ये आरपीएफ आणि जीआरपी जवान सोबत असतात. 
 
रेल्वे सुरक्षा दल कायद्यात सुधारणा
- गृह मंत्रलयाच्या सूचनेनुसार रेल्वे सुरक्षा दल कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव विधी आणि कायदा मंत्रलयाने ठेवला असून त्यामुळे गंभीर गुन्ह्यांची प्रकरणो हाताळताना आरपीएफला  बळ मिळेल, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. 
(विशेष प्रतिनिधी)